
एकीकडे भारताने बांग्लादेशचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे साऊथ आफ्रिकेने नेदरलँड्सचा पराभव केला आहे. साऊथ आफ्रिका आणि भारताचे 6 पॉईंट्स झाले आहेत. मात्र नेट रन रेट चांगला असल्यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांचा एक एक सामना बाकी राहिला आहे. त्यानंतर कोण सेमीफायनलमध्ये जाणार हे कळणार आहे.
भारताने 4 पैकी 3 सामने जिंकले असून भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र तरी देखील भारतासाठी सेमीफायनलचा मार्ग सोपं नसणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा बांग्लादेशसोबत अद्याप एक सामना बाकी आहे. तर दुसरीकडे भारताचा सामना 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरल्यास वर्ल्डकप च्या बाहेर जाणार आहे. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागणार आहे.
मात्र साऊथ आफ्रिकेसाठी सेमीफायनलचा रस्ता सोपं समजला जात आहे. कारण साऊथ आफ्रिका त्यांचा शेवटचा सामना बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. साऊथ आफ्रिका हा सामना जिंकल्यास भारत वर्ल्ड कप बाहेर जाणार आहे. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकवाच लागणार आहे. दोन्ही संघांनी आपले सामने जिंकले तरी भारत सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो कारण त्यांचा रनरेट चांगला आहे.
बांगलादेशला भारतीय महिला संघाने चारली धूळ
भारत अन् बांग्लादेशमध्ये अत्यंत महत्वाचा सामना पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करून भारताला 137 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून राधा यादव आणि श्रीचरणीने शानदार गोलंदाजी केली. अखेर या सामन्यात (Womens T20 World Cup) भारताने बांग्लादेशवर ५ विकेट्सने विजय मिळवला आहे.
IND W Vs BAN Live: राधा यादव अन् रेणुकाने बांग्लादेशला लोळवले; भारताला विजयासाठी 137 रन्सची गरज
भारताने आजचा सामना जिंकून सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र या सामन्यात भारताने पॉवरप्लेमध्ये गचाळ क्षेत्ररक्षण करत नको असलेला विक्रमही नावावर करून घेतला आहे. पण म्हणतात ना ‘शेवट गोड तर सर्व गोड’, त्याचप्रमाणे बांगलादेशला धूळ चारत अजूनही वर्ल्ड कपमध्ये पुढे जाण्याच्या चाहत्यांच्या आशा भारतीय महिला संघाने जीवित ठेवल्या आहेत हे मात्र नक्की.