Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL Team Rescue : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान धर्मशाळेतून आयपीएल संघाना काढले बाहेर, कुलदीप यादवने BCCI चे मानले आभार

८ मे रोजी पाकिस्तानने ड्रोन अटॅक आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली त्यानंतर पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामना रद्द करण्यात आला होता. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 09, 2025 | 11:01 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा ट्रेनचा प्रवास : २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांना त्याचा जीव गमवावा लागला. त्यांनंतर भारताने ७ मे रोजी सिंदूर ऑपरेशन केले आणि यामध्ये दहशतवाद्यांची ९ ठिकाणं उद्दवस्त केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले. ८ मे रोजी पाकिस्तानने ड्रोन अटॅक आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर तणाव वाढला आणि भारताने देखील प्रतित्युतर देण्यास सुरुवात केली. यावेळी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना सुरु होता.

शुक्रवारी म्हणजेच ९ मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सच्या संघांना धर्मशाळेतून बाहेर काढण्यात आले. दोन्ही संघांना कडक सुरक्षेत होशियारपूर मार्गे जालंधर रेल्वे स्टेशनवर नेण्यात आले. ही माहिती कांगडा पोलिस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, ही पथके सध्या एका विशेष ट्रेनने नवी दिल्लीला रवाना होत आहेत. गुरुवारी म्हणजेच ७ मे रोजी चंदीगडजवळील एअरपोर्ट भागामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर लगेचच पंजाब आणि दिल्ली यांच्यातील आयपीएल सामना मध्यावरच रद्द करण्यात आला, ज्यामुळे भारताला प्रत्युत्तर द्यावे लागले.

Thank you, @RailMinIndia, for arranging a special Vande Bharat train on such short notice to ferry the players, support staff, commentators, production crew members, and operations staff to New Delhi. We deeply appreciate your swift response. 🙌🏽@AshwiniVaishnaw | @JayShah |… pic.twitter.com/tUwzc5nGWD — IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025

पीटीआयशी बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी सकाळी दोन्ही संघांच्या संपूर्ण पथकाला, ज्यामध्ये खेळाडू, प्रशिक्षक कर्मचारी आणि प्रसारण कर्मचारी यांचा समावेश होता, सुमारे ४० ते ५० लहान वाहनांमधून धर्मशाळाहून पंजाब सीमेवरील होशियारपूरला नेण्यात आले. त्यांनी सांगितले की, कांगडा पोलिसांनी ताफ्याला सुरक्षा पुरवली होती आणि वाहने होशियारपूरला पोहोचल्यानंतर पंजाब पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था हाती घेतली. तिथून त्यांना जालंधरला खास व्यवस्था केलेल्या ट्रेनमध्ये नेण्यात आले.

IPL 2025 Suspended : उर्वरित आयपीएलचे सामने होणार या देशात! वाचा संपूर्ण माहिती

पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २० मिनिटांमध्ये धर्मशाला स्टेडियम रिकामे करण्यात आले होते. पुढे त्यांनी सांगितले की,तेथे असलेल्या सर्व खेळाडूंची आणि प्रेक्षकांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता होती. दोन्ही संघांच्या खेळाडूंना ताबडतोब मैदानातून परत बोलावण्यात आले आणि कडक सुरक्षेत त्यांच्या संबंधित हॉटेलमध्ये नेण्यात आले. त्याचबरोबर आयपीएलचे अध्यक्ष स्वतः मैदानावर उतरून त्यांनी मैदानावर पाहायला आलेले सर्व प्रेक्षकांना स्टेडियम रिकामी करण्याची विनंती केली.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तणाव सुरू झाला, ज्यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला होता. बीसीसीआयने म्हटले आहे की, जेव्हा देश दहशतवादी हल्ल्याला आणि सीमापारच्या अनावश्यक आक्रमणाला प्रतिसाद देत आहे, तेव्हा इतर बाबींपेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले जाते.

Web Title: Ipl team rescue from dharamsala amid indiapakistan tensions kuldeep yadav thanks bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 11:01 PM

Topics:  

  • bcci
  • cricket
  • IPL 2025

संबंधित बातम्या

धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार? रिझर्व्ह डे की..; ‘हा’ नियम उडवेल तुमची झोप
1

धो-धो पाऊस पडला तर IPL Playoff चा विजेता कसा ठरणार? रिझर्व्ह डे की..; ‘हा’ नियम उडवेल तुमची झोप

ई-सिगरेट ओढा अन् उपकर्णधार व्हा! INDIA Team A मध्ये जबाबदारी देताच BCCI ट्रोल, ‘हे’ खेळाडू बाहेर
2

ई-सिगरेट ओढा अन् उपकर्णधार व्हा! INDIA Team A मध्ये जबाबदारी देताच BCCI ट्रोल, ‘हे’ खेळाडू बाहेर

Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार
3

Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार

IND Vs AFG: विश्रांती द्यायचीच नाही! IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात; ‘या’ खेळाडूंना संधी मिळणार?
4

IND Vs AFG: विश्रांती द्यायचीच नाही! IPL संपताच टीम इंडिया पुन्हा मैदानात; ‘या’ खेळाडूंना संधी मिळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.