
Michael Vaughan चे खळबळजनक विधान (Photo Credit- X)
MICHAEL VAUGHAN ON SOUTH AFRICA. 🗣️ “I think of the stupidest team of the tournament? South Africa. Because if South Africa had allowed the West Indies to beat them in the Super 8s, India would have been knocked out. These things shouldn’t happen and usually don’t happen. I’m… pic.twitter.com/YY5pPLYmWg — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 13, 2026
‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये बोलताना मायकल वॉनने स्पर्धेतील समीकरण मांडले. सुपर 8 फेरीच्या एका महत्त्वाच्या सामन्यात एडन मार्करमच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा नऊ गडी राखून पराभव केला होता. वॉनच्या मते, जर आफ्रिकेने तो सामना वेस्ट इंडिजला जिंकू दिला असता, तर बलाढ्य भारतीय संघ त्याच वेळी स्पर्धेतून बाहेर झाला असता. भारताला स्पर्धेतून बाहेर काढण्याची तीच सर्वोत्तम संधी होती, जी आफ्रिकेने गमावली.
IND vs NZ : T20 World Cup 2026 आधी उकळला नवा वाद! मायकेल वॉनने आयसीसीवर केला पक्षपातीपणाचा आरोप
वॉन पुढे म्हणाला की, “तुम्हाला माहित आहे का या स्पर्धेतील सर्वात मूर्ख संघ कोणता आहे? तो म्हणजे दक्षिण आफ्रिका. जर त्यांनी सुपर 8 मध्ये वेस्ट इंडिजला स्वतःवर मात करू दिली असती, तर भारत बाद झाला असता. भारतासारखे वादळ रोखण्याची ती मोठी संधी होती. पण आफ्रिकेने तो सामना जिंकून भारताचे स्पर्धेतील अस्तित्व कायम राखले.” 51 वर्षीय वॉनच्या मते, विश्वचषक जिंकण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघाला (भारताला) सुरुवातीलाच स्पर्धेतून बाहेर करणे, जे आफ्रिकेला जमले नाही.
भारताने झिम्बाब्वेवर मिळवलेल्या विजयामुळे, वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना प्रत्यक्षात उपांत्यपूर्व फेरीसारखाच बनला. संजू सॅमसनच्या 97 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर, भारताने पाच गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले; परिणामी, वेस्ट इंडिजचा या स्पर्धेतून बाहेर पडला. पहिल्या उपांत्य फेरीत, न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव केला. दरम्यान, भारताने इंग्लंडचा सात धावांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आणि तिथे ‘कीवी’ संघाला 96 धावांनी मात देत टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.