
Mohammad Shami ची आग ओकणारी गोलंदाजी! (Photo Credit- X)
बंगालच्या ३२८ धावांच्या प्रत्युत्तरात जम्मू-काश्मीरचा संघ मोठ्या धावसंख्येकडे कूच करत होता. मात्र, मोहम्मद शमीने ९० धावांत ८ बळी घेत पाहुण्या संघाचा डाव ३०२ धावांवर गुंडाळला. यामुळे बंगालला २६ धावांची निसटती पण मोलाची आघाडी मिळाली. शमीचा यापूर्वीचा सर्वोत्तम विक्रम ७९ धावांत ७ बळी असा होता, जो त्याने आज मोडीत काढला.
An 8️⃣-wicket masterpiece 🫡 Watch 🎥 Mohd. Shami wreaks havoc with his career-best First Class figures of 8/90 🔥 Updates ▶️ https://t.co/QXyCuRIgVM#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/f4F3TYnSWi — BCCI Domestic (@BCCIdomestic) February 17, 2026
गेल्या वर्षी पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, या ऐतिहासिक कामगिरीनंतर शमीने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि त्यांच्या पॅनेलला एक स्पष्ट संदेश दिला आहे. भारताची पुढील कसोटी मालिका श्रीलंकेविरुद्ध होणार असून, शमीच्या या फॉर्ममुळे त्याच्या निवडीचा दावा आता अधिक मजबूत झाला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याची शमीची ही १५ वी वेळ आहे. त्याने जम्मू-काश्मीरच्या शुभम खजूरियापासून ते युधवीर सिंहपर्यंत ८ फलंदाजांना तंबूत धाडले. विशेषतः ९ व्या विकेटसाठी आकिब नबी आणि युधवीर सिंह यांनी ६४ धावांची भागीदारी करत बंगालची चिंता वाढवली होती. मात्र, शमीने या जोडीला अवघ्या ७ धावांच्या अंतरात बाद करत बंगालचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. बंगालचे उर्वरित दोन बळी मुकेश कुमारने टिपले.
भारतीय संघातून दुर्लक्षित राहूनही शमीने खचून न जाता घरगुती क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. या हंगामातील त्याची आकडेवारी थक्क करणारी आहे. रणजी ट्रॉफीमध्ये आतापर्यंत एकूण ३६ विकेट्स (सरासरी १६.५२). सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ७ सामन्यांत १६ बळी (बंगालसाठी सर्वाधिक यशस्वी). तर विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७ सामन्यांत १५ बळी घेतले आहे. आकिब नबीनंतर या हंगामात सर्वाधिक बळी घेणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. शमीचा सध्याचा स्ट्राइक रेट ३६.५८ इतका प्रभावी असून तो पूर्णपणे लयीत असल्याचे दिसून येत आहे.