अंतिम सामन्यात जम्मू आणि काश्मीरने आठ वेळा रणजी ट्रॉफी विजेता कर्नाटकचा पराभव केला. जम्मू आणि काश्मीरच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली, तर विजयाचा खरा नायक अजय शर्मा होता, हे कोण आहेत…
हुबळी येथे झालेल्या सामन्यात जम्मू आणि काश्मीरने वर्चस्व गाजवले आणि फलंदाजीने शानदार प्रभाव पाडला. सामना अनिर्णित राहिला, परंतु जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात आघाडी घेतली आणि त्यांना विजेते घोषित केले.
कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या रणजी ट्रॉफी फायनलच्या तिसऱ्या दिवशी यजमान संघाची आघाडीची फळी कोसळली. जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात ५८४ धावांचा मोठा आकडा गाठला आहे.
जम्मू आणि काश्मीरने बुधवारी इतिहास घडवला आहे. १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या उपांत्य फेरीच्या चौथ्या दिवशी बंगालला सहा विकेट्सने पराभूत केले. ६७ वर्षांनी जम्मू आणि काश्मीरने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश…
मोहम्मद शमीने आपल्या धारदार गोलंदाजीने क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळताना शमीने तब्बल ८ गडी बाद करत बंगालला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
बिहारने बीसीसीआय-आयोजित रणजी ट्रॉफीचे प्लेट ग्रुपच्या विजेतेपद जिंकले आहे. २२ ते २६ जानेवारी दरम्यान खेळवण्यात आलेल्या या सामन्यात, बिहारने मणिपूरला ५६८ धावांनी धूळ चारून एलिट ग्रुपमध्ये प्रवेश केला आहे.
भारताचा स्टार फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात असलेल्या सामन्यात मुंबईकडून खेळताना त्याने हैदराबादविरुद्ध शतक ठोकले आहे.
टी-२० संघात स्थान न मिळालेले स्टार खेळाडू आता २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. यामध्ये कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. हे दोघे २२ जानेवारी…