
पाकिस्तानने केली प्रथम फलंदाजी
सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तानला विजय महत्वाचा
पाकच्या पहिल्याच जोडीने केली 176 धावांवर विकेट
आज टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील महत्वाचा सामना खेळवला जात आहे. पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात आजचा सामना खेळवला जात आहे. पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा आहे. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी त्यांना आज विजयश्री खेचून आणावीच लागणार आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये धावा केल्या. पाकिस्तानने श्रीलंकेला धावांचे लक्ष्य दिले आहे. साहिबजादा फरहानने शतकी खेळी केली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने आपल्या डावाची जोरदार सुरुवात केली. पाकिस्तानच्या ओपनिंग जोडीने 176 धावांची भागीदारी केली. 176 वर पाकिस्तानची पहिली विकेट गेली. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने 64 धावांची खेळी केली. साहिबजादा फरहानने 32 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. 176 धावानंतर पाकिस्तानची फलंदाजी गडबडली. 34 धावांमध्ये 7 विकेट गमावल्या.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी 10 ओव्हर्समध्ये 100 धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानसाठी आजचा सामना अत्यंत महत्वाचा असल्याने फलदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. आता गोलदाजांची कसोटी लागणार आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये दव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजांना सामना जिंकायला मोठी कसरत करावी लागणार आहे.
Sahibzada Farhan scores a magnificent hundred to become the first batter to score two centuries in a single edition of the #T20WorldCup👏 It is one of the @marriottbonvoy Milestones of the tournament👌 📝: https://t.co/bgOYgFMMEO pic.twitter.com/NObcCrexUp — ICC (@ICC) February 28, 2026
पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे समीकरण काय आहे?
सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला ६३ धावांनी हरवावे लागेल. जर पाठलाग करायचा असेल तर त्यांना श्रीलंकेचे लक्ष्य १३.१ षटकात गाठावे लागेल. अशा प्रकारे, पाकिस्तान न्यूझीलंडच्या रनरेटला मागे टाकेल आणि ३ गुणांसह सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.
पाकिस्तान-श्रीलंका समोरासमोरचा विक्रम
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा श्रीलंकेविरुद्धचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. पाकिस्तानने आतापर्यंत १७ सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेने १२ सामने जिंकले आहेत. गेल्या सहा टी-२० सामन्यांकडे पाहता, पाकिस्तानला येथेही आघाडी आहे. पाकिस्तानने चार सामने जिंकले आहेत, तर श्रीलंकेला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत.