(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
टीम इंडियाला 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या सचिनने 90 आणि 2000 च्या दशकात भारताला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मजबूत संघाची ओळख दिली. त्याने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा एकदिवसीय सामना 18 मार्च 2012 रोजी आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. यानंतर 22 डिसेंबर 2012 रोजी त्याने वनडे फॉरमॅटला अलविदा केला. एकदिवसीय क्रिकेट अजून खेळण्याची संधी त्याच्याजवळ उपलब्ध होती तरीही त्याने बायबाय का केलं?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी मुख्य निवडकर्ता संदीप पाटील यांनी सचिनच्या वनडे क्रिकेटमधून निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे. 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर ‘मास्टर ब्लास्टर’ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु बीसीसीआयने त्याला आधीच सांगितले होते की सचिन तेंडुलकरच्या जागेच्या बदलीचा शोध घेत आहेत. 2012 मध्ये सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडले आणि आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणेही बंद केले. त्यावेळी सचिन फक्त कसोटी क्रिकेट खेळत होता.
माजी चीफ सिलेक्टर संदीप पाटील यांनी सचिनला फोन करून विचारले, ‘तुझा प्लॅन काय आहे?’ सचिनने उत्तर दिले, ‘का?’ पाटील यांनी सांगितले की, निवड समिती त्यांच्या बदलीचा शोध घेत आहे. हे ऐकून सचिन आश्चर्यचकित झाला.त्याने पुन्हा पाटील यांना कॉल केला आणि विचारलं की – तु खरंच सिरीयसली बोलतो आहेस का? पाटील म्हणाले, ‘हो.’ पाटील यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ‘निवडकर्ते खेळाडूला वगळू शकतात, पण त्याची कारकीर्द संपली असे ते म्हणू शकत नाहीत. आम्ही सचिनला त्याच्या योजनांबद्दल विचारले. तो म्हणाला की त्याला खेळायचे आहे. आम्ही म्हटलं ठीक आहे.’ त्यानंतर सचिनने हा निर्णय घेतला.






