
31 मे रोजी अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम सामना
बीसीसीआयने जाहीर केले प्ले ऑफचे वेळापत्रक
रोज होत आहेत नवे रेकॉर्ड आणि रोमांचक सामने
IPL 2026: आयपीएल 2026 चा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. प्ले ऑफच्या सामन्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. आयपीएल म्हटले की सिक्स, फोर, अनेक विक्रम, रोमांचक सामने पाहायला मिळतात. प्रत्येक डावात मोठी धावसंख्या पाहायला मिळत आहे. दरम्यान काही गोलंदाजांनी मात्र याला वगळले आहे. यंदाच्या पर्वात (Cricket News) काही गोलंदाजांनी आपल्या अचूक टप्प्याने फलंदाजांना चांगलंच जखडून ठेवलं आहे. आज आपण सर्वाधिक डॉट बॉल टाकणारे गोलंदाज जाणून घेऊयात.
1. मोहम्मद सिराज
मोहम्मद सिराज सध्या गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक डॉट बॉल टाकण्यात सिराज आघाडीवर आहे. त्याने आतापर्यंत झालेल्या गुजरात टायटन्सच्या सामन्यामध्ये 37 ओव्हर्स टाकल्या आहेत. त्यामध्ये त्याने 109 डॉट बॉल टाकले आहेत. तसेच 11 विकेट्स देखील त्याने घेतल्या आहेत.
2. जोफ्रा आर्चर
जोफ्रा आर्चर सध्या राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. राजस्थान रॉयल्सचा टो एक प्रमुख वेगवान गोलंदाज आहे. त्याने देखील 10 सामन्यात 37 ओव्हर्स टाकल्या आहेत. यामध्ये त्याने 107 डॉट बॉल टाकले आहेत. त्याने 15 विकेट्स घेतल्या आहेत. तो सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत आहे.
LSG Vs RCB Head To Head: विराटची बॅट की लखनौची फिरकी? हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोण आहे सरस?
3. कागिसो रबाडा
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज असलेला कागिसो रबाडा सध्या गुजरात टायटन्सकडून खेळत आहे. गुजरात टायटन्सचा तो प्रमुख गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 39 ओव्हर्स टाकल्या असून त्यामध्ये 100 डॉट बॉल टाकले आहेत.
4. मोहम्मद शामी
मोहम्मद शामी सध्या लखनौच्या संघाकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. त्याने 35 ओव्हर्स टाकल्या असून, त्यामध्ये शामीने 95 डॉट बॉल टाकले आहेत. तसेच त्याने 8 विकेट घेतल्या आहेत.
अब तु तो गया बेटा! ‘या’ बलाढ्य संघाविरुद्ध Vaibhav Suryvanshi खेळणार? बीसीसीआयने केली मोठी घोषणा
‘या’ बलाढ्य संघाविरुद्ध Vaibhav Suryvanshi खेळणार?
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये शानदार कामगिरी केली आहे. आक्रमक खेळीसाठी वैभवची ओळकह निर्माण झाली आहे. 15 वर्षीय वैभवचा फॉर्मपाहून बीसीसीआयने देखील त्याचा विचार केल्याचे पाहायला मिळत आहे. वैभवने आयपीएलमध्ये 10 सामने खेळून 404 रन्स केल्या आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत देखील कायम आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याचा विचार केला असल्याचे समजते आहे.