
श्रेयस अय्यर कर्णधार झाल्यावर भारताने आयर्लंडविरुद्ध आपली सिरिज गमावली. आयर्लंडने प्रथमच भारताला पराभूत केले. मात्र त्यानंतर इंग्लंडविरुद्ध सिरिज सुरू झाली. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. संजू सॅमसन तीनही सामन्यात अपयशी ठरला आहे. तर अभिषेक शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला अद्याप डेब्यू करण्याची संधी देण्यात आलेली नाहीये. त्यामू,ले अन्य खेळाडू चांगली कामगिरी करत नसताना देखील वैभवला संधी का दिली जात नाहीये असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. वेगवान गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये प्रभावी ठरले आहेत, पण त्यानंतर धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मँचेस्टरमध्ये आतापर्यंत एकूण १५ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने केवळ चार सामने जिंकले आहेत, तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने सहा सामने जिंकले असून पाच सामने रद्द झाले आहेत. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या सुमारे १५० धावा आहे. इंग्लंडने या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले असून, सात सामने जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत.मालिकेत १-० अशी आघाडी घेण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असेल.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता सुरू होणार आहे. सामना स्थानिक वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरू होईल. यावेळी पाऊस पडण्याची २० टक्के शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती.