
बीसीसीआयने केली भारत अ संघाची घोषणा
तिलक वर्मा करणार भारताचे नेतृत्व
रियान परागवरून बीसीसीआयवर टीका
BCCI Troll At Social Media: बीसीआयने भारतीय संघांची घोषणा केली आहे. भारतीय संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. जून महिन्यात सामने होणार आहेत बीसीसीआयने भारत अ संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व तिलक वर्मा करणार आहे. तर रियान परागवर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यावरून आता सोशल मिडियावर बीसीसीआयला ट्रोल केले जात आहे. हे नेमके प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात.
जून महिन्यात भारत अ आणि श्रीलंका अ तसेच ‘अफगाणिस्तान अ’ या संघांमध्ये सामने होणार आहे. या वन-से ट्राय सिरिजमध्ये अनेक युवा खेळाडू दिसणार आहेत. त्यामुळे आशियाई क्रिकेटमधील युवा खेळाडूंमध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने या संघाची धुरा तिलक वर्माकडे सोपवली आहे. रियान पराग उपकर्णधार असणार आहे. दरम्यान आयपीएलमध्ये तो वेपिंग करताना आढळून आला होता. त्यामुळे आता बीसीसीआयला ट्रोल केले जात आहे.
पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान रियान पराग ड्रेसिंग रूममध्ये ध्रुव जुरेलसोबत गप्पा मारताना वेपिंग करत असल्याचा व्हिडिओ लाइव्ह मॅचमध्ये समोर आला होता. त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली होती. भारतात ई-सिगारेटवर बंदी असताना देखील रियान परागच्या कृतीवर बीसीसीआयने केलेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे ट्राय सिरिज भारत अ संघाचे उपकर्णधारपद त्याला दिल्याने चाहते नाराज झाले आळसयचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर बीसीसीआयच्या या भूमिकेवर कडाडून टीका होत आहे.
🚨 News 🚨 India A squad for ODI tri-series in Sri Lanka announced. The upcoming tri-series is scheduled to be held in June, 2026. More Details ▶️ https://t.co/ZmL2u1boAW pic.twitter.com/7WXzZeeUFq — BCCI (@BCCI) May 14, 2026
🚨 News 🚨 India A squad for ODI tri-series in Sri Lanka announced. The upcoming tri-series is scheduled to be held in June, 2026. More Details ▶️ https://t.co/ZmL2u1boAW pic.twitter.com/7WXzZeeUFq — BCCI (@BCCI) May 14, 2026
बीसीसीआयने प्रियांश आर्या आणि वैभव सूर्यवंशीसह, आयुष बडोनी, निशांत सिंधू या नवख्या खेळाडूना संधी दिली आहे. श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ विरुद्धची ही त्रिकोणीय मालिका या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार करेल, असे बीसीसीआयचे म्हणणे असल्याचे समोर येत आहे.
Vaibhav Suryvanshi अन् ‘या’ खेळाडूंची Team India त एन्ट्री; श्रीलंकेविरुद्ध खेळणार
प्रभसिमरन सिंग आणि कुमार कुशाग्र यांच्या खांद्यावर विकेट कीपिंगची जबाबदारी सांभाळणार आहेत. या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने आणि उत्कृष्ट विकेट कीपिंगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोलंदाजीची धुरा यश ठाकूर, युद्धवीर सिंग, अंशुल कंबोज आणि अरशद खान या वेगवान गोलंदाजांवर असणार आहे.