
Indian Cricket Team
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची स्पर्धा अधिक रंगतदार होणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून या स्पर्धेची रंगत अधिक वाढवली आहे. तसेच आपणही या स्पर्धेत कायम असल्याचे भारतीय संघाने दाखवून दिले आहे. दरम्यान फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला किती पॉईंट्स आणि पीसीटीची गरज असणार आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.
श्रीलंकेविरुद्ध सामना खेळण्याच्या आधी भारतीय संघाचा पीसीटी ४८.१५ इतका होता. तर सामना जिंकल्यावर ५३. ३३ इतका झाला आहे. याआधी ज्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल्स झाल्या त्यामध्ये जे दोन संघ खेळतात त्यांचा पीसीटी ६० च्या वर असल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाला यासाठी अजून ८ सामने खेळायचे आहेत. त्यामध्ये श्रीलंकेविरुद्ध होणारा एक सामना देखील असणार आहे.
WTC Point Table: श्रीलंकेचा खात्मा निश्चित! मैदान गाजवल्यावर WTC पॉईंट्सचे समीकरण कसे ठरणार
उर्वरित ८ सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ५ ते ६ सामने जिंकावे लागणार आहेत. पाच सामने जिंकल्यावर आणि दोन सामने अनिर्णित झाल्यावर देखील भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचू शकतो. भारतीय संघाने आठ पैकी सहा सामने जिंकले तर भारताचा पीसीटी ६२.९६ इतका होऊ शकतो. उर्वरित पैकी आणखी एखादा सामना भारताने जिंकला तर भारत फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत मजबूत स्थितीत पोहोचणार आहे.
भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध सिरिज खेळून झाल्यावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. या दोन्ही सिरिज भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला अत्यंत चांगली कामगिरी करवाई लागणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत भारताच्या पुढे आहेत. त्यामुळे भारतासाठी आव्हान मोठे असणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारताने पहिला सामना जिंकला असला तरी भारत पाचव्या स्थानावरच आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतासमोर मोठे कठीण आव्हान असणार आहे.