Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-दक्षिण आफ्रिका फायनलच्या सामन्यात पाऊस आला तर काय होणार? वाचा सविस्तर

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज सामना रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन बार्बाडोसमध्ये करण्यात आले आहे. या सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला तर या सामन्याचा निकाल कसा जाहीर होणार? या संदर्भात सविस्तर वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 29, 2024 | 10:57 AM
फोटो सौजन्य - ICC

फोटो सौजन्य - ICC

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : T-२० विश्वचषक २०२४ च्या फायनलच्या लढतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळणार आहे. आजचा हा महामुकाबला बार्बाडोसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल. भारताच्या संघाने शेवटचा T-२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकला होता. आता भारताचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या संघाने अजुनपर्यत एकही सामना गमावलेला नाही. परंतु बार्बाडोसमधील हवामानाची अपडेट समोर आली आहे. असे म्हंटले जात आहे की, बार्बाडोस सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसामुळे सामना रद्द होणार की राखीव दिवशी खेळवणार?

जर पावसामुळे या सामन्यावर परिणाम झाला तर या सामन्याचा निकाल कसा जाहीर होणार? कोणत्या संघाला विजयी घोषित करणार असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना भारतीय वेळेनुसार आज रात्री आज वाजता सुरु होणार आहे. या सामन्यापूर्वी जर पाऊस पडला तर नाणेफेक साठी उशीर होऊ शकतो. परंतु या सामन्याची महत्वाची बाब म्हणजेच अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. मात्र, नियोजित तारखेला कोणतीही शक्यता नसतानाच सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना जर नियोजित वेळेमध्ये झाला नाही तर किमान १० षटकांचा सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी हे शक्य नसेल, तर सामना राखीव दिवशी म्हणजेच रविवारी खेळवला जाईल. त्यामुळे चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही. टीम इंडिया खूप मजबूत स्थितीत आहे. यावेळी त्याने T२० विश्वचषकात एकही सामना गमावलेला नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्माही फॉर्मात आहे. गेल्या दोन सामन्यांत त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. विराट कोहलीचा फॉर्म टीम इंडियासाठी तणावाचा विषय बनू शकतो. सलामीवीर म्हणून कोहली अजून काही विशेष करू शकलेला नाही. रोहित आणि कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली सुरुवात केल्यास संघ मोठी धावसंख्या करू शकतो.

Web Title: What will happen if it rains in india south africa final match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2024 | 10:57 AM

Topics:  

  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • indian cricket team
  • T20 world cup final

संबंधित बातम्या

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक
1

IND VS PAK : Asia Cup २०२५ पूर्वी देशात गोंधळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सोशल मीडियावर चाहते आक्रमक

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
3

Asia Cup 2025 : आज होणार भारतीय संघाची आशिया कपसाठी घोषणा! अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

IND vs ENG Test : ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, या खेळाडूला पहिल्यांदाच केले संघात सामील! करणार पदार्पण?
4

IND vs ENG Test : ऋषभ पंत मालिकेतून बाहेर, या खेळाडूला पहिल्यांदाच केले संघात सामील! करणार पदार्पण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.