Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asia Cup History: आशिया कपचा पहिला हंगाम कधी खेळला गेला होता? कोणत्या संघाने जिंकले होते विजेतेपद? वाचा इतिहास

आशिया कपची पहिली आवृत्ती 1984 साली खेळली गेली होती. त्यावेळी या स्पर्धेत केवळ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन संघांचा सहभाग होता. ही स्पर्धा 'राउंड रॉबिन' पद्धतीने खेळली गेली ज्यात प्रत्येक संघाने दोन-दोन सामने खेळले

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 07, 2025 | 07:47 PM
Asia cup 2025: Big change in Asia Cup match schedule! What time will India-Pakistan be played? Find out

Asia cup 2025: Big change in Asia Cup match schedule! What time will India-Pakistan be played? Find out

Follow Us
Close
Follow Us:

Asia Cup 2025: आशियाई क्रिकेटचा सर्वात मोठा महासंग्राम, आशिया कप 2025, लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व 8 संघांनी आपापल्या संघांची घोषणा केली आहे. वनडे आणि टी-20 दोन्ही फॉरमॅटचा विचार करता, ही आशिया कपची 17वी आवृत्ती असणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या स्पर्धेची सुरुवात तब्बल ४१ वर्षांपूर्वी झाली होती आणि पहिल्याच आवृत्तीत भारताने बाजी मारली होती?

पहिल्या आवृत्तीत फक्त तीन संघांचा सहभाग

आशिया कपची पहिली आवृत्ती 1984 साली खेळली गेली होती. त्यावेळी या स्पर्धेत केवळ भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तीन संघांचा सहभाग होता. ही स्पर्धा ‘राउंड रॉबिन’ पद्धतीने खेळली गेली, ज्यात प्रत्येक संघाने दोन-दोन सामने खेळले. एकूण तीन सामन्यांनंतर गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित करण्यात आले, त्यावेळी अंतिम सामना (फायनल) खेळवला गेला नव्हता.

हे देखील वाचा: Asia Cup 2025 : जितेश शर्मा नाही तर हा खेळाडू खेळणार पाचव्या क्रमांकावर…इरफान पठाणने आशिया कपसाठी निवडली Playing 11

भारताने दोन्ही सामने जिंकून मिळवला होता विजय

1984 च्या एशिया कपमधील पहिला सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झाला, ज्यात श्रीलंकेने विजय मिळवला. त्यानंतर, सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध 10 विकेट्सने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला 54 धावांनी नमवून भारताने दोन्ही सामन्यांत विजय मिळवला. गुणतालिकेत भारत 8 गुणांसह अव्वल स्थानी राहिल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले. श्रीलंकेने एक सामना जिंकल्याने त्यांचे 4 गुण होते, तर पाकिस्तानला दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता.

आशिया कप 2025 चे यजमानपद भारताकडे

अशियन क्रिकेट कौन्सिलकडे (ACC) आशिया कपच्या आयोजनाचा अधिकार आहे. यावर्षी आशिया कप 2025 चे यजमानपद भारताला मिळाले आहे, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हे सामने तटस्थ ठिकाणी म्हणजेच युएई (UAE) मध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, अफगाणिस्तान, युएई, ओमान आणि हाँगकाँग असे एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.

टीम इंडियाचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी

टीम इंडिया आशिया कप 2025 मध्ये 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर त्यांचा पुढचा सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी होईल. हे दोन्ही सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळले जातील. त्यानंतर भारतीय संघ 19 सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध आपला पुढचा सामना खेळेल. या आशिया कपसाठी टीम इंडियाला ग्रुप-ए मध्ये स्थान देण्यात आले आहे. दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर-4 मध्ये स्थान मिळवतील.

आशिया कप 2025 साठी टीम इंडियाचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग

Web Title: When was the first season of asia cup played which team won the title read history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • History
  • Sports
  • Sports News
  • Team India

संबंधित बातम्या

IND vs SA T20 मालिकेच्या वेळेत बदल! आता सर्व सामने ‘या’ वेळेपासून खेळले जाणार
1

IND vs SA T20 मालिकेच्या वेळेत बदल! आता सर्व सामने ‘या’ वेळेपासून खेळले जाणार

Smriti Mandhana Wedding : स्मृतीने लग्न कॅन्सल झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर Palash Muchhal ची सोशल मिडियावर नवी Post Viral
2

Smriti Mandhana Wedding : स्मृतीने लग्न कॅन्सल झाल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर Palash Muchhal ची सोशल मिडियावर नवी Post Viral

Smriti Mandhana Wedding Cancel : लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच स्मृती मानधनाने केले वक्तव्य! म्हणाली – ‘पुढे जाण्याची वेळ…
3

Smriti Mandhana Wedding Cancel : लग्न मोडल्यानंतर पहिल्यांदाच स्मृती मानधनाने केले वक्तव्य! म्हणाली – ‘पुढे जाण्याची वेळ…

IND vs SA 1st T20 : अर्शदीप पुन्हा संघाबाहेर? हार्दिकचे पुनरागमन निश्चित! कशी असेल भारतीय संघाची पहिल्या सामन्यात Playing 11
4

IND vs SA 1st T20 : अर्शदीप पुन्हा संघाबाहेर? हार्दिकचे पुनरागमन निश्चित! कशी असेल भारतीय संघाची पहिल्या सामन्यात Playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.