
रोहित शर्मा पद्मश्री घ्यायला का नाही पोहचला (फोटो सौजन्य - Instagram)
भारतीय क्रिकेटमधील योगदान, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय संघासोबत मिळवलेले आंतरराष्ट्रीय यश यांबद्दल भारत सरकारने रोहितला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीतून वेळ काढून या सोहळ्याला वैयक्तिकरित्या हजेरी लावली, तर रोहितला वेळापत्रकाच्या अडचणींमुळे पुरस्कार स्वीकारता आला नाही.
तो आला आणि त्यानं बडवलं! मुंबईच्या ‘राजा’चं जोरदार कमबॅक; Rohit Sharma चे शानदार अर्धशतक
पुरस्कार वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये प्रदान केले जातात
पद्म पुरस्कार पारंपरिकरित्या राष्ट्रपती भवनात अनेक आठवडे चालणाऱ्या वेगवेगळ्या सोहळ्यांमध्ये प्रदान केले जातात, ज्यात पुरस्कार विजेत्यांना वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागले जाते. आता अशी अपेक्षा आहे की रोहित शर्मा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या दुसऱ्या सोहळ्यात अधिकृतपणे आपला पुरस्कार स्वीकारेल. यावर्षी प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये रोहित शर्माचे नाव प्रामुख्याने समाविष्ट असल्याने, तो या सोहळ्याला उपस्थित राहील अशी चाहत्यांना आशा होती.
दुसरे कारण म्हणजे, २५ मे रोजी पुरस्कार प्रदान करण्यासाठी नेमलेल्या गटात रोहित शर्माचा समावेश नव्हता. तथापि, जेव्हा चाहत्यांच्या लक्षात आले की रोहित पुरस्कार सोहळ्यात अनुपस्थित आहे, तेव्हा इंटरनेटवर एकच चर्चा सुरू झाली. राष्ट्रपती भवनात इतर विजेत्यांसोबत तो का दिसला नाही, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पद्म पुरस्कार सोहळे सामान्यतः टप्प्याटप्प्याने आयोजित केले जातात आणि अनेक पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या वेळापत्रकानुसार आणि सरकारी निधीनुसार, त्यानंतरच्या सोहळ्यांमध्ये सन्मानित केले जाते. अन्यथा चाहत्यांनी चुकीचा कयास लावणे बंद करावे. दुसऱ्या टप्प्यात रोहित नक्की उपस्थित राहील असाच आता सर्वांचा अंदाज आहे.
Rohit Sharma Birthday: स्वत:पेक्षा संघाला मोठं करणारा ‘कॅप्टन’; विक्रमांच्या ‘हिटमॅन’चा आज वाढदिवस
रोहितचा दमदार खेळ
रोहितने यावर्षी IPL 2026 मध्येही दमदार खेळ दाखवला आहे. काही सामने तो त्याच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मात्र जितके सामने खेळला एक सामना वगळता त्याने आपली कामगिरी चोख बजावली. मात्र यावर्षी मुंबई इंडियन्सला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. गुणतालिकेत ९ व्या स्थानावर त्यांना समाधान मानावे लागले.