
Yashasvi Jaiswal Heated argument with Asitha fernando
भारताच्या डावातील १७ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर, असिथा फर्नांडो राऊंड द विकेट गोलंदाजी करत आला आणि त्याने एक अप्रतिम चेंडू टाकला. चेंजडू बाउन्स होउन आत वळला. जैस्वालने चेंडू ऑफ-साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या इनसाइड एड्जला लागून थेट स्टम्प्सवर आदळला आणि तो बोल्ड झाला.यशस्वी जैस्वालची विकेट घेतल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने जल्लोष केला. जैस्वाल शांतपणे पॅव्हेलियनकडे परतत होता. त्याचवेळी, गोलंदाज असिथा फर्नांडो काहीतरी बोलला, ज्यामुळे जयस्वालने मागे वळून पाहिले आणि लगेचच असिथाच्या दिशेने वळला. दोघांची डोकी एकमेकांवर आदळली. त्यानंतर फर्नांडोने जैस्वालला बाजूला खेचले आणि श्रीलंकेचा कर्णधार धनंजय डी सिल्वाने परिस्थिती शांत केली. त्याने यशस्वी जैस्वालला बाजूला खेचून मैदान सोडण्याची विनंती केली. या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. केएल राहुल बाद झाल्यानंतरही जयस्वाल मोठे फटके खेळत राहिला. यानंतर, १७ व्या षटकात असिथा फर्नांडोच्या गोलंदाजीवर जैस्वाल क्लीन बोल्ड झाला. ५३ चेंडूंमध्ये ४५ धावा करून जयस्वाल बाद झाला. या भारतीय सलामीवीराने आपल्या खेळीत नऊ चौकार मारले, पण त्याचे अर्धशतक हुकले.
पहिल्या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये केएल राहुलने शानदार फलंदाजी केली. कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावातही राहुल चांगल्या लयीत होता. त्याने ३२ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या होत्या. मात्र, ११ व्या षटकात, लाहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात केएल राहुल यष्टीरक्षक निरोशन डिकवेलाच्या हाती झेलबाद झाला. यामुळे राहुलचा प्रभावी डाव संपुष्टात आला.पहिल्या सत्रात भारताने २५ षटकांत २ विकेट गमावून ८८ धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल २९ चेंडूंत ११ धावांवर, तर देवदत्त पडिक्कल ३५ चेंडूंत १३ धावांवर खेळत आहे.