
AI क्रांती की संकट? मशीन्सवरचं मानवी नियंत्रण संपणार? तज्ज्ञांच्या इशाऱ्याने जगभरात वाढली चिंता
जगातील सर्वात मोठ्या एआय कंपन्यांपैकी एक ‘अँथ्रॉपिक’ ने एक धक्कादायक विधान केले आहे. जॅक क्लार्क यांच्या मते, जगाने सर्वात प्रगत एआयच्या विकासाचा वेग काही काळासाठी कमी करण्याचा किंवा तात्पुरता थांबवण्याचा पर्याय खुला ठेवला पाहिजे. जगभरात लिहिले जाणारे ८०% पेक्षा जास्त नवीन कॉम्प्युटर कोड आता माणूस लिहीत नाही, असा दावा करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
याला सोप्या शब्दात ‘मशिनद्वारे मशिनची निर्मिती म्हणता येईल. समजा, एआयचे व्हर्जन १ स्वतःच्या बुद्धीने व्हर्जन २ बनवते. त्यानंतर दुसरे मॉडेल स्वतःहून तिसरे मॉडेल बनवते. ही प्रक्रिया इतक्या वेगाने चालते की प्रत्येक नवीन मॉडेल मागील मंडिलपेक्षा हजार पटीने अधिक बुद्धिमान आणि सक्षम होत जाते. या चक्रात माणूस कुठेही मध्यभागी नसतो.
काही वर्षांपूर्वीपर्यंत एआय फक्त तेच करायचा जे माणूस त्याला सांगायचा. परंतु, आता ते स्वतःच समस्यांवर उपाय शोधू लागले आहे. उदाहरणार्थ, गुगल डीपमाइडच्या ‘अल्फा इव्हॉल्व या एआय सिस्टीमने मानवी मदतीशिवाय स्वतःच डेटा सेंटर्सची कार्यपद्धती सुधारण्याचे आणि एआय ट्रेनिंग सुधरफास्ट करण्याचे नवीन मार्ग शोधून काढले आहेत. शास्त्रज्ञांनुसार, भविष्यात माणूस मुख्य संशोधक राहणार नाही, तर फक्त एक ‘रिसर्च डायरेक्टर बनून राहील, ज्याचे काम फक्त दुरून दिशा दाखवणे असेल.
सॉफ्टवेअर कोड लिहिणे: पूर्वी १००% कॉम्प्यूटर कोड मानवी डेव्हलपर्स स्वतः चे डोके चालवून लिहायचे. आता एआय स्वतः ८०% पेक्षा जास्त कोड लिहीत आहे. २०१९ मध्ये एका प्रगत एआय मॉडेलला ट्रेन करण्यासाठी १६८ तास लागले होते. प्रसिद्ध संशोधक आंदेज कारपेंशी यांनी आधुनिक एआय एजंटच्या मदतीने हेच काम अवघ्या ३ तासांत करून दाखवले.
निर्णय घेण्याची क्षमता: पूर्वी एआय फक्त एका कॅल्क्युलेटरसारखे होते, जे मानवी आदेशांचे पालन करायचे. आता एआय स्वतःच गुंतागुंतीच्या समस्यांवर नवीन उपाय शोधत आहे.
मानवाची भूमिका : माणूसच तंत्रज्ञानाचा मुख्य सर्वकाही होता. आता माणूस केवळ ‘रिसर्व डायरेक्टर’ किंवा मार्गदर्शक या भूमिकेपर्यंतच मर्यादित असतो.