
सरकारच्या वकिलांनी न्यायालयात दिलेल्या स्पष्टीकरणानुसार टेलिग्रामची रचना क्लाउड आधारित आहे. यामुळेच ही कारवाई करण्यात आली. टेलिग्रामवरील ग्रुप्स, चॅनेल आणि सार्वजनिक माहिती समुदायांमधून माहिती जास्त वेगाने पसरते. यामुळे पेपर लीक होण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा सरकारने केला आहे. शिवाय ही माहिती मोठ्या प्रमाणात असल्याने रोखणे किंवा हटवने आव्हानात्मक आहे.
टेलिग्रामवर चॅट, फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती कंपनीच्या क्लाउड सर्व्हरवर सेव्ह होते. सरकारच्या मते, यामुळे नवीन मोबाईल किंवा संगणकावर लॉगीन करून लोकांना डेटा सहज मिळतो. यामुळे बेकायदेशीर माहितीचा प्रसार रोखणे अधिक कठीण होते.
दुसरीकडे, व्हॉट्सॲपवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असल्यामुळे पाठवलेला मेसेज केवळ पाठवणारा आणि प्राप्त करणाराच वाचू शकतो. कंपनीला देखील हा संदेश पाहता येत नाही. डेटा ही वापरकर्त्याच्या मोबाईलमध्येच सेव्ह होतो. यामुळे टेलिग्रामच्या तुलनेत व्हॉट्सॲप वर माहिती प्रसारित होण्याची शक्यता कमी असते.
यामुळे पेपर लीक प्रकरणानंतर टेलिग्रामवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. २१ जून रोजी होणाऱ्या NEET च्या फेरपरीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटणे आणि चुकीची माहिती पसरणे रोखणे असल्याने ही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी तात्पुरती असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच, ३० जूनपर्यंत ‘मेसेज एडिट’ (संदेशात बदल करण्याचे) करण्याचे फिचर बंद करण्याचे निर्देशही टेलिग्रामला देण्यात आले आहे.
VPN म्हणजे काय? Telegram युजर्स का सर्च करत आहेत? Google Trends मध्ये अचानक वाढ