स्मार्टफोन खरेदीचा ट्रेंड बदलला! फोन घेताना आता कॅमेरा-रॅम नाही, AI फीचर्सला प्राधान्य; सर्व्हेतून धक्कादायक आकडे समोर
संदर्भानुसार सहाय्य ही सर्वांत मोठी मागणीः या सर्वेक्षणानुसार, ८२% ग्राहक एआय वैशिष्ट्यांच्या आधारावर मोबाईल फोन खरेदी करत आहेत. २५ टक्के ग्राहकांना संदर्भानुसार मदत करणारी वैशिष्ट्ये (कन्टेक्शच्युअल असिस्टन्स फिचर्स) हवी आहेत. हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेते आणि सूचना देते, जसे की स्क्रीनवर काहीतरी शोधणे किंवा संदेशाला उत्तर सुचवणे. यानंतर, १८ टक्के ग्राहक जनरेटिव्ह फोटो एडिटिंगला पसंती देतात. १७ टक्के ग्राहकांची पसंती व्हिज्युअल सर्चला आहे. आणखी ११ टक्के ग्राहकांना अॅडॅप्टिव्ह बॅटरी मॅनेजमेंट हवे आहे. यावरून हे स्पष्ट होते की मोबाईल बॅटरीचे आयुष्य ग्राहकांसाठी अजूनही खूप महत्त्वाचे आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
सर्वेक्षणातून एक मनोरंजक निष्कर्ष समोर आला आहे. तीनपैकी एक ग्राहक आपल्या पुढच्या फोनवर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याचा विचार करत आहे. १५ टक्के ग्राहक ५० ते ७५ हजार रुपयांदरम्यानचा फोन शोधत आहेत. १७ टक्के ग्राहकांचे बजेट ७५ हजारांपेक्षा जास्त आहे. तथापि, २५ ते ५० हजार हा विभाग सर्वांत लोकप्रिय आहे, ज्यात ४२ टक्के ग्राहक या बजेटमध्ये नवीन फोन शोधत आहेत. १५ हजारांपेक्षा कमी किमतीचे फोन केवळ ७ टक्के ग्राहकांसाठी पसंतीचे आहेत.
लोक आपले फोन वारंवार बदलण्याची शक्यता कमी असते. ५४ टक्के ग्राहकांना त्यांचे मोबाईल फोन दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ टिकावेत अशी अपेक्षा आहे. ४८ टक्के ग्राहक पुढील तीन महिन्यांत फोन अपग्रेड करण्याची योजना आखत आहेत. सर्वांत आश्चर्यकारक आकडेवारी लहान शहरांमधून समोर आली आहे. ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे फोन खरेदी करणाऱ्यांमध्ये १८ टक्के ग्राहक महानगरांमधील आहेत. टियर-२ शहरांमधील १७ टक्के आणि टियर-३ शहरांमधील १५ टक्के लोकांना या महागड्या फोनमध्ये रस आहे.
एआयची क्रेझ वाढत असली तरी, मूलभूत वैशिष्ट्यांचे महत्त्व किंचितही कमी झालेले नाही. आजही, ८७ टक्के ग्राहक फोनच्या परफॉर्मन्सला सर्वांत महत्त्वाचे मानतात, त्यानंतर ७९ टक्के ग्राहक बॅटरीच्या आयुष्याला प्राधान्य देतात, ७७ टक्के ग्राहक फोन खरेदी करताना कॅमेऱ्याच्या गुणवत्तेचा विचार करतात.






