
Tech Tips: गेमिंग -स्ट्रिमिंगमुळे नाही, तर ‘या’ कारणामुळे लवकर संपते फोनची बॅटरी! वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात
जर तुम्ही अशा ठिकाणी बसला आहात जिथे मोबाईल नेटवर्क कमजोर आहे तर अशावेळी तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी जास्त खर्च होईल. मात्र जर तुम्ही अशा ठिकाणी बसला असाल जिथे पावरफुल नेटवर्क आहे तर बॅटरी कमी खर्च होते. जेव्हा नेटवर्क कव्हरेज कमी किंवा अस्थिर असते, तेव्हा फोन कनेक्शन राखण्यासाठी फोनला जास्त बॅटरी वापरावी लागते.
जेव्हा स्मार्टफोनची बॅटरी कमी होऊ लागते, तेव्हा लोकं वेगवेगळे उपाय करतात. जसे फोनची ब्राइटनेस कमी करतात, अॅप्स बंद करतात, फोनमधील पावर सेवर मोड ऑन करतात. पण खरंच याचा परिणाम होतो का? जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे नेटवर्क कमजोर आहे, तर या ट्रिक्स फायदेशीर ठरणार नाहीत. तुमचा फोन सतत मोबाईल नटवर्कच्या शोधात असतो आणि मोबाईल नेटवर्कसोबत कनेक्ट राहण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. याच कारणांमुळे स्मार्टफोनची बॅटरी संपते. तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे नेटवर्क कमकुवत आहे आणि तुम्ही फोनचा वापर देखील करत नसाल. मात्र तरी देखील अशावेळी तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी संपणार आहे.
जर तुम्ही अशा भागात असाल जिथे नेटवर्क कमजोर आहे, तर तुमचा फोन जवळील टॉवरसोबत कनेक्ट होण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. यामुळे एक्स्ट्रा हीट जनरेट होते आणि तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. तर स्टेबल नेटवर्क असलेल्या ठिकाणी फोनला डेटा ट्रांसमिट करण्यासाठी जास्त बॅटरी खर्च करावी लागत नाही. याच कारणामुळे तुमच्या फोनला सिग्नल शोधावे लागत नाही. म्हणूनच पूर्ण नेटवर्क कव्हरेज असताना फोनची बॅटरी जास्त काळ टिकते.
जर तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथे स्मार्टफोनला नेटवर्क नाही, तर अशावेळी तुम्ही एयरप्लेन मोड ऑन करू शकता. यामुळे फोनच्या सिस्टीमला नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करण्यापासून रोखले जाईल, ज्यामुळे बॅटरीचा वापर कमी होईल. गरज पडल्यास तुम्ही मॅन्युअली वाय-फाय किंवा कॉलिंग सक्षम करू शकता.