सपकाळ यांनी त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावल्याचा दावा करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या विधानातून हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी शोधली आहे
भाजपाकडून माझ्या वक्तव्याची मोडतोड करून "ध" चा "मा" करून राज्यात दंगली घडवायच्या आहेत, याचा प्रत्यय आज पुण्यात आला, असे प्रत्युत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपाला दिले आहे.
स्लॅब कोसळण्याची घटना निकृष्ट बांधकामाचे उदाहरण आहे. तथाकथीत विकास पुरुष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे, अशी प्रतिक्रीया हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
परभणीत काँग्रेस पक्षाने ठाकरेंच्या शिवसेनेसारखी भूमिका घ्यायची का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या भाजपाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. महाराष्ट्राने धडाडीचे कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शोकभावना सपकाळ यांनी व्यक्त केल्या.
विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
"बदलापूरची घटना ही सत्ताधार्यांना जोरदार चपराक आहे, पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसणे, त्यातून अत्याचार गुंडागर्दी किती वाढत चालली, देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करणे गरजेचे आहे