अहिल्यानगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. विशेषतः पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील कलिंगड, गहू आणि कांदा पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. हाताशी आलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी खासदार निलेश लंके यांनी ढवळपुरी भागात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने मदतीचा पाठपुरावा करणार असल्याचेही लंके यांनी सांगितले.
अहिल्यानगर जिल्ह्यात काल सायंकाळपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. विशेषतः पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरातील कलिंगड, गहू आणि कांदा पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला. हाताशी आलेली पिके डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. यावेळी खासदार निलेश लंके यांनी ढवळपुरी भागात प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने मदतीचा पाठपुरावा करणार असल्याचेही लंके यांनी सांगितले.