वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसांत तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाखांहून अधिक नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून ८० हजार ते १ लाख एक्स-रे तपासण्या करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे संशयित रुग्णांचे लवकर निदान होऊन ६ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे ५० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून सध्या सुमारे ३,५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना टीबीची लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून ‘टीबी मुक्त भारत’ अभियानांतर्गत गेल्या १०० दिवसांत तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत २ लाखांहून अधिक नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले असून ८० हजार ते १ लाख एक्स-रे तपासण्या करण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे संशयित रुग्णांचे लवकर निदान होऊन ६ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. यापैकी सुमारे ५० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून सध्या सुमारे ३,५०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाकडून नागरिकांना टीबीची लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.