खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत कोकणावर रेल्वे सेवांमध्ये अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला. उत्तर भारताला मोठ्या प्रमाणात गाड्या दिल्या जात असताना कोकणासाठी अत्यल्प गाड्यांची तरतूद करण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. दादर-रत्नागिरी गाडी बंद आणि काही गाड्यांची क्षमता कमी केल्याने प्रवाशांना मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणासाठी अधिक गाड्या सुरू करून विद्यमान सेवा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत कोकणावर रेल्वे सेवांमध्ये अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला. उत्तर भारताला मोठ्या प्रमाणात गाड्या दिल्या जात असताना कोकणासाठी अत्यल्प गाड्यांची तरतूद करण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. दादर-रत्नागिरी गाडी बंद आणि काही गाड्यांची क्षमता कमी केल्याने प्रवाशांना मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणासाठी अधिक गाड्या सुरू करून विद्यमान सेवा पूर्ववत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.