कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडी परिसरात माती उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे साचले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टाटा पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कामांमुळे उभे राहिलेले हे मातीचे डोंगर पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, उत्खननानंतर योग्य सुरक्षितता उपाययोजना न केल्याने गावावर धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसात ही माती घसरून वाडीवर येण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडी परिसरात माती उत्खननामुळे मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे साचले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टाटा पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या कामांमुळे उभे राहिलेले हे मातीचे डोंगर पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या मते, उत्खननानंतर योग्य सुरक्षितता उपाययोजना न केल्याने गावावर धोका निर्माण झाला आहे. मुसळधार पावसात ही माती घसरून वाडीवर येण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.