कोल्हापूरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने होणारा किरणोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलायं.श्री अंबाबाई मंदिरात ऑगस्ट 2024 पासून गरुडमंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे..त्यामुळे मावळती सूर्यकिरणं श्री अंबाबाईच्या मूर्तीवर अचूक पडावीत यासाठी आता गरुड मंडपाची उंची 7 इंचानी वाढवण्यात येणार आहे..या बाबतचा प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पुरातत्त्व विभागाकडे सादर करण्यात आला आहे..आई अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुडमंडपाला विशेष महत्त्व असून यामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात..मात्र काही वर्षापूर्वी गरुडमंडपला काही प्रमाणात वाळवी लागल्याने त्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलंय..सध्या श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या फ्लोरिंगचे काम सुरू असतांना आठ इंच पाया लागला आहे..हा पाया भरून घेतल्याने गरुड मंडपाची उंची सात ते आठ इंचांनी वाढणार आहे..सध्या मंडप उभारणीचे काम विविध टप्प्यांत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे..त्यामुळे गरुडमंडपच्या उंचीवाढीला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कामांना गती दिली मिळणार आहे..या गरुडमंडपची उंची वाढल्यास किरणोत्सव अधिक व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात पारंपरिक पद्धतीने होणारा किरणोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलायं.श्री अंबाबाई मंदिरात ऑगस्ट 2024 पासून गरुडमंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू आहे..त्यामुळे मावळती सूर्यकिरणं श्री अंबाबाईच्या मूर्तीवर अचूक पडावीत यासाठी आता गरुड मंडपाची उंची 7 इंचानी वाढवण्यात येणार आहे..या बाबतचा प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पुरातत्त्व विभागाकडे सादर करण्यात आला आहे..आई अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुडमंडपाला विशेष महत्त्व असून यामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात..मात्र काही वर्षापूर्वी गरुडमंडपला काही प्रमाणात वाळवी लागल्याने त्याच्या पुनर्बांधणीचं काम सुरू करण्यात आलंय..सध्या श्री अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाच्या फ्लोरिंगचे काम सुरू असतांना आठ इंच पाया लागला आहे..हा पाया भरून घेतल्याने गरुड मंडपाची उंची सात ते आठ इंचांनी वाढणार आहे..सध्या मंडप उभारणीचे काम विविध टप्प्यांत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे..त्यामुळे गरुडमंडपच्या उंचीवाढीला मंजुरी मिळाल्यानंतरच पुढील कामांना गती दिली मिळणार आहे..या गरुडमंडपची उंची वाढल्यास किरणोत्सव अधिक व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने पार पडण्यास मदत होणार आहे.






