लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका करत ‘शेवटचा लढा आणि ओबीसी आरक्षण गाढा’ हेच जरांगेंचे धोरण असल्याचा आरोप केला. बेकायदेशीर जीआर काढून धनदांडगे व आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. याविरोधात १ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने भव्य ओबीसी मोर्चा निघणार असल्याचे हाके यांनी जाहीर केले. सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडले असून, आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्व सामान्य ओबीसी बांधवांनी कोणत्याही नेत्याच्या भ्रमात न राहता स्वतः रस्त्यावर उतरावे, असे कळकळीचे त्यांनी केले.
लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका करत ‘शेवटचा लढा आणि ओबीसी आरक्षण गाढा’ हेच जरांगेंचे धोरण असल्याचा आरोप केला. बेकायदेशीर जीआर काढून धनदांडगे व आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांना कुणबी दाखले देऊन ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. याविरोधात १ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस टोल नाक्यावरून मुंबईच्या दिशेने भव्य ओबीसी मोर्चा निघणार असल्याचे हाके यांनी जाहीर केले. सरकारने ओबीसींना वाऱ्यावर सोडले असून, आरक्षणाच्या संरक्षणासाठी सर्व सामान्य ओबीसी बांधवांनी कोणत्याही नेत्याच्या भ्रमात न राहता स्वतः रस्त्यावर उतरावे, असे कळकळीचे त्यांनी केले.