शहरात मुली बेपत्ता होणे आणि गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. शहरात मुली बेपत्ता होण्याबाबत पसरवले जाणारे वृत्त हे केवळ एक खोटे नरेटिव्ह असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल पूर्ण ताकदीने काम करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरात आतापर्यंत एकूण ४९ मुली बेपत्ता झाल्याची तक्रार होती. त्यापैकी ३८ मुलींना पोलिसांनी सुखरूप शोधून काढले आहे. बेपत्ता झालेल्या बहुतांश मुली या प्रेमसंबंधातून घर सोडून गेल्या होत्या. ज्या मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही, त्या केवळ १ ते २ दिवसांपूर्वीच बेपत्ता झालेल्या आहेत. मुली शोधण्याच्या बाबतीत पुणे पोलिसांचे ‘रिकव्हरी प्रमाण’ तब्बल ९७ टक्के असून पोलीस सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत.गुन्हेगारी वाढल्याच्या आरोपांना उत्तर देताना आयुक्तांनी सांख्यिकी आकडेवारी सादर केली. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पुण्यात गुन्हेगारी कमालीची घटली आहे. अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यांमध्ये २० टक्के, तर मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये १५ टक्क्यांची घट झाली आहे. हत्येच्या घटनांमध्ये काही अंशी वाढ झाली असली तरी, त्यातील ८ घटना या कौटुंबिक आणि अंतर्गत वादातून नातेवाईकांनीच घराच्या आत केल्याचे समोर आले आहे.
शहरात मुली बेपत्ता होणे आणि गुन्हेगारी वाढल्याच्या चर्चांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. शहरात मुली बेपत्ता होण्याबाबत पसरवले जाणारे वृत्त हे केवळ एक खोटे नरेटिव्ह असून त्यात कोणतेही तथ्य नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच पुणेकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल पूर्ण ताकदीने काम करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरात आतापर्यंत एकूण ४९ मुली बेपत्ता झाल्याची तक्रार होती. त्यापैकी ३८ मुलींना पोलिसांनी सुखरूप शोधून काढले आहे. बेपत्ता झालेल्या बहुतांश मुली या प्रेमसंबंधातून घर सोडून गेल्या होत्या. ज्या मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही, त्या केवळ १ ते २ दिवसांपूर्वीच बेपत्ता झालेल्या आहेत. मुली शोधण्याच्या बाबतीत पुणे पोलिसांचे ‘रिकव्हरी प्रमाण’ तब्बल ९७ टक्के असून पोलीस सातत्याने शोध मोहीम राबवत आहेत.गुन्हेगारी वाढल्याच्या आरोपांना उत्तर देताना आयुक्तांनी सांख्यिकी आकडेवारी सादर केली. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये पुण्यात गुन्हेगारी कमालीची घटली आहे. अटेम्प्ट टू मर्डरच्या गुन्ह्यांमध्ये २० टक्के, तर मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये १५ टक्क्यांची घट झाली आहे. हत्येच्या घटनांमध्ये काही अंशी वाढ झाली असली तरी, त्यातील ८ घटना या कौटुंबिक आणि अंतर्गत वादातून नातेवाईकांनीच घराच्या आत केल्याचे समोर आले आहे.