
चिपळूणमध्ये पाणी साचलेल्या भागांची नगराध्यक्षांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
पाहणीदरम्यान नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी स्वतः पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पाण्याचा निचरा तातडीने होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नाले आणि गटारांमध्ये अडथळे असल्यास ते तात्काळ हटवावेत, पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करावी आणि पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर युद्धपातळीवर काम करावे, असे आदेश त्यांनी दिले.
पुरंदरला दमदार पावसाने बळीराजा सुखावला; माऊलींच्या आगमनापूर्वीच पाण्याचा प्रश्न मिटणार
शहरातील संवेदनशील भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी संबंधित विभागांना दिल्या. पावसाचा जोर कायम असतानाही विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली.
यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
चिपळूण नगर परिषदेकडून शहरातील संवेदनशील भागांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पाणी साचू नये यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केल्यामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, संकटाच्या काळात प्रशासन तत्परतेने काम करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?