आखातीयुद्धांच्या परिणामामुळे गॅस पुरवठा कमी होत असल्याने सांगली शहरातील सर्वच एलपीजी पंप सध्या बंद झाले असून याचा दुष्परिणाम एलपीजी रिक्षा चालकांच्या रोजी रोटी वर होत आहे. कारण रिक्षासाठी लागणारा एलपीजी गॅस पुरवठा बंद झाल्याने प्रवासी वाहतुकीबरोबरच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूकही थांबली आहे. पर्यायाने याचा परिणाम रिक्षा चालकांच्या आमदानीवर होत असून, शासनाने लवकरात लवकर याबाबत प्रभावी अशी उपाययोजना करावी अशी मागणी रिक्षा चालक -मालक बंधूं कडून होत आहे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एलपीजी रिक्षा चालकांनी निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत.
आखातीयुद्धांच्या परिणामामुळे गॅस पुरवठा कमी होत असल्याने सांगली शहरातील सर्वच एलपीजी पंप सध्या बंद झाले असून याचा दुष्परिणाम एलपीजी रिक्षा चालकांच्या रोजी रोटी वर होत आहे. कारण रिक्षासाठी लागणारा एलपीजी गॅस पुरवठा बंद झाल्याने प्रवासी वाहतुकीबरोबरच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूकही थांबली आहे. पर्यायाने याचा परिणाम रिक्षा चालकांच्या आमदानीवर होत असून, शासनाने लवकरात लवकर याबाबत प्रभावी अशी उपाययोजना करावी अशी मागणी रिक्षा चालक -मालक बंधूं कडून होत आहे. या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एलपीजी रिक्षा चालकांनी निदर्शने करत आपल्या मागण्या मांडल्या आहेत.