कडक उन्हामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर कैलास पवार यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर जावे आणि मास्क, पिण्याचे पाणी तसेच टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा, असे सांगितले. तसेच दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. योग्य काळजी घेतल्यास डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका टाळता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कडक उन्हामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असून नागरिकांना उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टर कैलास पवार यांनी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर जावे आणि मास्क, पिण्याचे पाणी तसेच टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा, असे सांगितले. तसेच दिवसातून किमान दोन ते तीन लिटर पाणी पिण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. योग्य काळजी घेतल्यास डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका टाळता येऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.