दहावी-बारावी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष उपक्रम सुरू केला आहे. शहरात ५४ रायडर्सच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. वाहन बिघाड किंवा वाहतूक कोंडी झाल्यास तातडीने सहाय्य मिळणार आहे. यासाठी हेल्पलाईन क्रमांक आणि व्हॉट्सॲप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षाकाळात नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दहावी-बारावी परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचता यावे यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी विशेष उपक्रम सुरू केला आहे. शहरात ५४ रायडर्सच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. वाहन बिघाड किंवा वाहतूक कोंडी झाल्यास तातडीने सहाय्य मिळणार आहे. यासाठी हेल्पलाईन क्रमांक आणि व्हॉट्सॲप सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षाकाळात नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.