Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

All Party Delegation: ‘जवाहरलाल नेहरूंपासून PM मोदींपर्यंत…’ कनिमोळींच्या शिष्टमंडळाने रशियामध्ये पाकिस्तानचा पाडला फडशाच

All Party Delegation : भारताच्या राजनैतिक धोरणात अलीकडे मोठा बदल पहायला मिळत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आता अधिक आक्रमक आणि स्पष्ट भूमिका स्वीकारली आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 25, 2025 | 11:45 AM
A delegation led by Kanimozhi exposed Pakistan in Russia

A delegation led by Kanimozhi exposed Pakistan in Russia

Follow Us
Close
Follow Us:

All Party Delegation : भारताच्या राजनैतिक धोरणात अलीकडे मोठा बदल पहायला मिळत आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आता अधिक आक्रमक आणि स्पष्ट भूमिका स्वीकारली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली रशियामध्ये गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पाकिस्तानचा निषेध करत दिलेला ठाम इशारा.

मॉस्को येथे झालेल्या द्विपक्षीय बैठकीत भारताने पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा पर्दाफाश करत, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचा निर्णायक प्रयत्न केला. या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे सदस्य, माजी राजदूत, आणि धोरणविशेषज्ञ सहभागी होते. या बैठकीत रशियाने भारताच्या भूमिकेचा पूर्ण पाठिंबा दर्शवत, दहशतवादाविरोधातील संयुक्त लढ्याची तयारी दर्शवली.

कनिमोळींचा स्पष्ट संदेश, ‘हल्ला चालू असेल तर चर्चा नाही’

द्रमुक खासदार कनिमोळी यांनी मॉस्कोमध्ये माध्यमांशी बोलताना पाकिस्तानवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “पाकिस्तान आपल्या हद्दीत दहशतवादी तळ चालवतो आणि त्यांना पाठीशी घालतो. आम्ही केवळ दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करतो. जोपर्यंत पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत राहील, तोपर्यंत शांततेसाठी चर्चा होऊ शकत नाही.” त्यांनी असेही स्पष्ट केले की, भारताचा विरोध पाकिस्तानातील सामान्य नागरिकांशी नाही, तर तेथे राज्य पुरस्कृत दहशतवादाला आहे. याचबरोबर, जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदींपर्यंत सर्व पंतप्रधानांनी पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला नेहमी हल्ल्यांनी उत्तर देण्यात आले, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Pakistan News: भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या बिलावल भुट्टोच्या बहिणीच्या ताफ्यावर पाकिस्तानात बेकायदेशीर जमावाचा हल्ला

रशियाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा, भारताने मांडली ठोस बाजू

शिष्टमंडळाने रशियाचे उप परराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेन्को, माजी पंतप्रधान मिखाईल फ्राडकोव्ह, तसेच रशियाच्या उच्चस्तरीय संसदीय सदस्यांशी चर्चा केली. या बैठकीत भारताने अलीकडील पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या दहशतवादी नेटवर्कविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी रशियाने भारताच्या दहशतवादाविरोधी भूमिकेला पाठिंबा दर्शवून संयुक्त सहकार्याची तयारी व्यक्त केली. यामुळे भारताचे सुरक्षा विषयक आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक दृढ झाले आहे.

शिष्टमंडळातील इतर सदस्यांची मते

शिष्टमंडळातील आप नेते डॉ. अशोक कुमार मित्तल यांनी पाकिस्तानातील लोक चांगले असले तरी सरकार आणि लष्कर भारतविरोधी असल्याचे मत मांडले. ते म्हणाले, “मी पंजाबी असून पाकिस्तानला भेट दिली आहे. तेथील सामान्य नागरिक शांतताप्रिय आहेत, पण शासन आणि सैन्य भारताविरोधात जहरी मानसिकता बाळगतात.” माजी राजदूत मंजीव पुरी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका मांडली. “जर पाकिस्तान स्वतःच्या हद्दीतील दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर जगाने त्यात लक्ष घालणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

मॉस्को भेटीचे जागतिक महत्त्व

रशिया हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य असून, जागतिक राजकारणात त्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे भारताचे हे शिष्टमंडळ मोठ्या रणनीतिक डावपेचाचा भाग असल्याचे मानले जाते. यामधून भारताने हे स्पष्ट केले की, पाकिस्तानचा दहशतवादी अजेंडा केवळ भारतापुरता मर्यादित नसून जागतिक शांततेसाठी धोका आहे. शिष्टमंडळाने मॉस्कोतील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून भारताच्या अहिंसेच्या परंपरेचे स्मरण करून दिले, मात्र त्याचवेळी, ‘दहशतवाद्यांसोबत कोणतीही सहानुभूती शक्य नाही’, हा कणखर संदेशही दिला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, भारताच्या ‘S-400’ ने पाकच्या AWACS चा उडवला धुवा; रचला विश्वविक्रम

 आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा आक्रमक आणि सुसंगत आवाज

या शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे भारताने राजनैतिक आणि रणनीतिकदृष्ट्या रशियासारख्या सामर्थ्यशाली मित्रदेशाची पाठराखण मिळवण्यात यश मिळवले आहे. कनिमोळींच्या नेतृत्वात दिलेला संदेश केवळ पाकिस्तानसाठी नव्हे, तर संपूर्ण जागतिक समुदायासाठी आहे. दहशतवाद सहन केला जाणार नाही आणि जबाबदारी टाळणाऱ्यांना आता शांततेच्या टेबलावर जागा नाही.

Web Title: A delegation led by kanimozhi exposed pakistan in russia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 11:45 AM

Topics:  

  • india
  • India pakistan Dispute
  • india pakistan war
  • Russia

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा
3

Asaduddin Owaisi: ‘जर मी मुस्लिम आहे तर…’, ‘I Love Muhammed’ या वादावर ओवैसींचा इशारा

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
4

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.