
balen shah nepal pm anti india decisions border rules 2026
Balen Shah Nepal PM Anti-India decisions : दक्षिण आशियातील भारताचा सर्वात जवळचा शेजारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. २७ मार्च रोजी बालेन शाह (Balen Shah) यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आणि तेव्हापासूनच भारत-नेपाळ संबंधांमध्ये एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. बालेन शाह यांनी गेल्या ४५ दिवसांत घेतलेल्या निर्णयांवरून हे स्पष्ट होत आहे की, ते आपल्या ‘भारतविरोधी’ प्रतिमेवर ठाम आहेत. काठमांडूचे महापौर असताना ‘आदिपुरुष’ चित्रपटाला विरोध करणारे बालेन आता पंतप्रधान म्हणून भारतासमोर मोठी आव्हाने उभी करत आहेत.
बालेन शाह यांनी घेतलेला सर्वात धक्कादायक निर्णय म्हणजे भारतीय परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना भेटण्यास दिलेला नकार. वास्तविक, भारत आणि नेपाळमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मिस्री नेपाळला जाणार होते. परंतु, शाह यांनी आपण केवळ आपल्या समकक्षांनाच (पंतप्रधान स्तरावर) भेटू, असे सांगत हा दौरा धुडकावून लावला. एका परराष्ट्र सचिवाचा अशा प्रकारे अपमान करणे ही राजनैतिक वर्तुळात मोठी घटना मानली जात आहे. यामुळे भारताने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, अंतर्गत गोटात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Agni MIRV Missile: भारताचा ‘दिव्यास्त्र’ प्रहार! ड्रॅगनला बसला ताकदीचा जबरदस्त धक्का; गुप्तहेर जहाज तैनातीही ठरली निष्फळ
नेपाळच्या नवीन सरकारने पुन्हा एकदा जुन्या सीमा वादाला हात घातला आहे. लिपुलेख आणि कालापानी हे प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असतानाही, बालेन शाह यांनी चीनच्या एका संदर्भाचा वापर करत यावर नेपाळचा दावा ठोकला आहे. केपी शर्मा ओली यांच्या काळात जो नकाशा वादाचा विषय ठरला होता, तोच अजेंडा बालेन पुढे रेटत आहेत. मानसरोवर यात्रेसंदर्भात बोलताना त्यांनी नेपाळचे हित सर्वात आधी असल्याचे सांगून भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
This was certain to happen but the tide will change. Balen Shah does not have the political capital or the military backing. This denial of a meeting with FS Misri or the land dispute are just political stunts and it is better to treat them as such. Balen Shah’s inexperience… https://t.co/U0fxVoS2eE pic.twitter.com/d4FUCUv4pf — The Unknown (@_TheUnknown007_) May 10, 2026
credit – social media and Twitter
भारत-नेपाळ सीमेवर राहणाऱ्या मधेसी नागरिकांसाठी बालेन सरकारचा नवीन ‘कस्टम’ (सीमा शुल्क) नियम अत्यंत जाचक ठरत आहे. नेपाळमधील महागाईपासून वाचण्यासाठी हे नागरिक दररोजच्या जीवनावश्यक वस्तू भारतातून खरेदी करत असत. मात्र, आता १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल नेपाळमध्ये नेल्यास त्यावर कर भरावा लागणार आहे. यामुळे सीमावर्ती भागातील गरिबांना मोठा आर्थिक फटका बसला असून, जनसामान्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
भारत आणि नेपाळमध्ये १७५१ किलोमीटरची खुली सीमा आहे, जिथे कोणत्याही व्हिसा किंवा पासपोर्टची गरज लागत नाही. मात्र, बालेन शाह यांनी आता प्रत्येक भारतीय नागरिकाला नेपाळमध्ये प्रवेश करताना ओळखपत्र सोबत ठेवणे आणि अनिवार्य सुरक्षा तपासणीतून जाणे बंधनकारक केले आहे. यामुळे या भागात व्यापार आणि पर्यटनासाठी येणाऱ्या भारतीयांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुरक्षा आणि नियम म्हणून हे पाऊल योग्य वाटत असले, तरी त्यामागील राजकीय हेतू हा भारताला त्रास देण्याचाच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hantavirus : हळूहळू होणारा मृत्यू, रहस्यमय ताप आणि फुफ्फुसांमध्ये पाणी; जाणून घ्या किती धोकादायक आहे हंता विषाणू?
बालेन शाह हे केवळ राजकारणी नसून ते एक इंजिनिअर आणि रॅपरही आहेत. तरुणांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. २०२२ मध्ये त्यांनी ‘बृहत्तर नेपाळ’ (Greater Nepal) चा नकाशा शेअर केला होता, ज्यामध्ये भारताचे काही भाग नेपाळचा हिस्सा म्हणून दाखवण्यात आले होते. तेव्हापासूनच त्यांच्या मनात भारताबद्दल असलेल्या भूमिकेची कल्पना आली होती. आता पंतप्रधान म्हणून त्यांच्या हातात सत्ता आल्यावर ते हेच जुने मुद्दे अधिक आक्रमकपणे मांडत आहेत.