
Bangladesh elections 2026
जुलै २०२४ मध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात झालेले आदोलनांत शेख हसीना (Sheikh Hasina) सरकारला पायउतार व्हावे लागले होते. या आंदोलना सुमार १,४०० लोकांचा सुरक्षा दलांच्या कारवाईत मृत्यू झाला होता. ५ ऑगस्ट २०२४ मध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, माजी पंतप्रधान हसीना यांना आपला देश सोडून भारतात यावे लागले होते.
हसीना यांच्या पतनानंतर भारत आणि बांगलादेश संबंधात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. बांगलादेशच्या न्यायाधिकरणाने आंदोलनातील हिंसाचाराच्या आरोपांखील हसीन यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच त्यांच्या प्रत्यार्पणाची भारताकडे मागणी केली होती. परंतु यावर भारताने कोणताही निर्णय घेतलेला नाही. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध अधिकच ताणले गेले आहेत.
शेख हसीना यांच्या पतनानंतर भारत आणि बांगलादेशचे संबंध बिघडलेले असून आज निवडणुक ही भारतासाठी निर्णयाक ठरणार आहे. यामुळे भारताच्या धोरणात्मक आणि राजनैतिक भविष्याला नवी दिशा मिळणार आहे. सध्या बांगलादेशात शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर निवडणुक लढवण्यासाठी बंदी आहे अशा परिस्थिती भारताच्या अनुकूल पक्ष सत्तेत येणे अत्यंत महत्वाचे आहे. भारतासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे कट्टरतावादी पक्ष जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टी (BNP) आहे.
जमात-ए-इस्लामीचा कल पाकिस्तानकडे आणि विचारधारा कट्टरपंथी असल्याने त्यांची सत्ता येणार भारतासाठी धोक्याचे ठरु शकते. यामुळे भारत-बांगलादेश सीमाेवर कट्टरतावादी तणाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु जमात-ए-इस्लामीची सत्ता स्थापन झाल्या, सीमा वाद आणि तीस्ता नदीच्या पाण्याचे वाटप यांसारख्या मुद्यांवरुन वाद होण्याची शक्यता आहे. जमात ने शेजीरा देशांसोबत शांततापूर्ण संबंधाचे आश्वासन दिले आहे तसेच एका हिंदू उमेदवाराला टिकटही दिले आहे. परंतु त्यांच्या पाकिस्तानकडे झुका आणि इस्लामिक विचारसरणी भारतासाठी चिंताजनक आहे.
पण याच वेळी दुसरीकडे BNP चे नेते तारिक रहमान सत्तेत आल्यास भारताला काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. त्यांची धोरणे भारताच्या समर्थनार्थ नसली तरी त्यांनी प्रचारादरम्यान हिंदू उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी पावले उचलली आहे. तसचे त्यांनी BNP पक्ष सूड बुद्धीने नाही, तर न्याय आणि मानवतेच्या राजकारमावर विश्वास ठेवतो असा संदेश निवडणुक प्रचारादरम्यान दिला होता.
सध्या या दोन्ही पक्षांच्या सत्तेत येण्याने भारतासाठी काही आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. तसचे आणखी इतरही पक्ष निवडणुकीत उतरले आहे. या सर्व परिस्थितीचा भारतावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंनी परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भारत सध्या या निवडणुकीकडे बारकाईने लक्ष देऊन आहे.