
Bangladesh Threat
Sheikh Hasina च्या प्रत्यार्पणावर मोठी अपडेट समोर; जाणून घ्या भारताची काय आहे भूमिका?
बांगलादेशी मौलाना इनायतुल्लाह त्यांच्या भारतविरोधी भाषणामुळे सतत चर्चेत असतात. यावेळी त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमधील सत्ताबदलावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम समाज असुक्षित असेल, तर बांगलादेशातील हिंदूनाही सुरक्षा मिळणार नाही. अशा उघड धमकी दिली आहे. त्यांच्या या धमकीमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मौलानांनी भारताच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करताना बांगलादेशच्या तारिक रहमान (Tarique Rahman) सरकाकडेही मोठी मागणी केली आहे. भारताशी असलेले व्यापारी आणि राजकीय संबंध तोडून टाकण्यात यावे असे म्हटले आहे. भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन राजकीय दबाव निर्माण करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
मौलना यांच्या मते, पश्चिम बंगालमध्ये आता हिंदू केंद्रित व्यवस्था राबवली जाईल. तेथील मुस्लिम व्यापाऱ्यांची दुकाने हटवण्यासाठी खेळ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी मौलाना अब्बासी यांनी बांगलादेशातील मदरशांना लष्करी तळे म्हणून वापरण्याची आणि भारतावर हल्ल्याची धमकी दिली होती. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर इस्लामिक झेंडा फडकवू असे त्यांनी म्हटले होते.
इनायतुल्लाह अब्बासी त्यांच्या कट्टरपंथी विचारसरणीसाठी ओळखले जातात. त्यांनी २०२४ मार्च मध्ये जिहादची हाक दिली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) , बंगलाच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधातही भाष्य केले होते.
सध्या बांगलादेशी मौलाना अब्बासी यांच्या अशा प्रभोक्षक विधानानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. तसेच भारताचे परराष्ट्र मंत्रालय (MEA) देखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सीमेपलीकडून धार्मिक युद्धाचे ऐलान केले जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे सीमावर्ती भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील जनतेला अफवांना बळी न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बांगलादेशात मोठा नरसंहार टळला! सुरक्षा यंत्रणांनी ‘असा’ उधळला दहशतवादी कट, देशभरात हाय अलर्ट
Ans: पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार आल्याने मौलाना अब्बासी यांनी प्रभोक्षक विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, जर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम असुरक्षित असतील, तर बांगलादेशमधील हिंदूनाही सुरक्षित राहू दिले जाणार नाही. तसेच भारताशी व्यापारी संबंध तोडण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
Ans: मौलाना अब्बासी यांच्या मते, भारत पश्चिम बंगालमध्ये हिंदू केंद्रित व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयाने मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आणि त्यांच्या व्यवसायांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही मौलानांनी केला आहे.