India destroys Pakistan's air defence system in Lahore under Operation Sindoor
इस्लामाबाद: भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम फत्ते करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना उद्ध्वस्त करुन टाकले आहे. पहलगामच्या हल्ल्यात बळी गेलेल्या 28 निष्पाप नागरिकांच्या मृत्यूचा बदला अखेर भारताने बदला घेतला आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तान भांबरला आहे. भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानची एअर डिफेन्स रडार सिस्टीम पूर्णत: नष्ट झाली आहे. दरम्यान भारताने अजूनही ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवले आहे.
पाकिस्तानने भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या 15 शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय लष्कराने सर्व हल्ले हाणून पाडले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवले आहे. भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स रडार सिस्टीम नष्ट केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी भारतीय सशस्त्रे दलाने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींवर हल्ला केला. तसेच लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली देखील उद्धवस्त करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, फरी, पूंछ, मेंढर आणि राजौरी सेक्टरमध्ये LoC वर मोर्टार आणि तोफाखानांचा वापर करत हल्ला केला होता.
This morning, the Indian Armed Forces targeted Air Defence Radars and systems at a number of locations in Pakistan. Indian response has been in the same domain with same intensity as Pakistan. It has been reliably learnt that an Air Defence system at Lahore has been neutralised.… pic.twitter.com/z2OexT2nJP
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानच्या लाहोरमधील HQ-9 एअर डिफेन्स रडार सिस्टीम ही चीनकडून मिळालेली आहे. परंतु भारताने ही प्रणाली नष्ट करुन दाखवून दिले आहे की, भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर कोणीही टिकू शकत नाही. भारताच्या हवाई दलाने S-400 या अत्याधुनिक सुदर्शन चक्र क्षेपणास्त्राचा वापर केला आहे. पाकिस्तानचे चीनकडून मिळालेले HQ-9 रडार भारताच्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांसमोर टिकू शकलेले नाही.
भारताच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जम्मू, अवंतीपोरा, अमृतसर, जालंघर आदमपूर, लुधियाना, पठाकोट, बंठिंडा आणि चंदीगडसह 15 शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. परंतु भारताने ही क्षेपणास्त्रे हाणून पाडली आहेत.
भारताच्या सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले आहेत. यासाठी भारताने हॅमर स्कॅल्प आणि इतर अचूक शस्त्रांचा वापर केला. तसेच भारताच्या S-400 देखील यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. भारताच्या हवाई क्षेत्राच्या रक्षणामध्ये S-400 मध्ये महत्वपूर्ण ठरले आहे. शत्रुच्या हल्ल्याला पाडण्यासाठी भारताची ही प्रणील महत्वपूर्ण ठरली आहे.