
Rajnath Singh
राजनाथ सिंह यांनी दहशतवाद्याच्या मुद्दावर जगाला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, दहशतवादा मानवतेसाठी मोठा शत्रू असून त्याविरोधात भारताचे धोरण झिरो टॉलरेंस राहील. त्यांनी पहलगाम (Pahalgam) हल्ल्याचा संर्दभ देत म्हटले की, ही घटना केवळ एका देशावर हल्ला नसून संपूर्ण मानवजातीवर वार आहे.
ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) चा उल्लेख करत राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, दहशतवादी कोणत्याही शिक्षेपासून सुटू शकणार नाहीत. हे भारताच्या शून्य सहनशीलतेचे उत्तम उदाहरण आहे असे त्यांनी म्हटले. त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाला कोणताही धर्म आणि सीमा नसते. यामुळे सीमेपार होणाऱ्या दहशतवादाविरोधात सर्वांनी एकजूट होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले.
याशिवाय राजनाथ सिंह यांनी, भारत केवळ नवी जागतिक व्यवस्था तयार करण्यापेक्षा अधिक सुव्यवस्थित जग कायर करण्ययावर भर देतो हे स्पष्ट केले आहे. एकतर्फी निर्णयामुळे जागतिक शांतता धोक्यात येते. युद्धामुळे केवळ जीवितहानी होत नाही, तर अर्थव्यवस्थाही कोलमडते. यामुळे सर्वांनी कट्टरतावाद आणि फुटीरतादाविरोधा एकत्र येण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.
राजनाथ सिंग यांनी प्रदेशिक स्थिरता राखून, द्विपक्षीय मतभेद बाजूला ठेवून सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी परिषदेत संदेश दिला की, SCO आंतरराष्ट्रीय निकषांचे पालन करणारा संरक्षण म्हणून याविरोधात काम करणे आवश्यक आहे. तरच जगाची समृद्धी होईल असे राजनाथ सिंह यांनी म्हटले. केवळ प्रादेशिकच नव्हे, तर संपुर्ण जगभरात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याची प्रत्येकाची जबाबादरी आहे हे भारताने सांगितले. भारताच्या या भूमिकेकडे विश्वबंधुत्वाचा संदेश म्हणून पाहिले जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ के दौरान हमने स्पष्ट कर दिया कि आतंकवाद के केंद्र अब सज़ा पाने से किसी भी तरह बच नहीं सकते। यह ऑपरेशन आतंकवाद और उसके समर्थकों के प्रति हमारे ‘zero tolerance’ दृष्टिकोण का प्रमाण है। pic.twitter.com/Qg2vA2sv9d — Rajnath Singh (@rajnathsingh) April 28, 2026
Russia Iran Relation : आता खेळ पलटणार! इराणसाठी Putin मैदानात; UN मध्ये थेट अमेरिकेला ललकारले
Ans: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले की, भारताची दहशतवादावर भूमिका शून्य सहनशिलतेची आहे. दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो. त्यांनी सीमापार दहशतवादावर टीका करत जागतिक समुदायाला त्याविरोधात एकजुट होण्याचा संदेश दिला.
Ans: भारत केवळ नवी जागतिक व्यवस्था तयार करण्यापेक्षा अधिक सुव्यवस्थित जग कायर करण्ययावर भर देतो हे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे.