
फोटो सौजन्य सोशल मीडिया
भारत आणि अमेरिका हे सामान भागीदार असल्याने व्यापारातील मतभेद एकत्रितपणे सोडवणे आवश्यक आहे . असे गोर यांनी सांगितले . करप्रणाली आणि नियामक धोरणांमध्ये सातत्य व स्पष्टता राहिल्यास कंपन्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचे निर्णय घेणे सोपे होईल . अचानक बदलणारे नियम आणि अनिश्चित धोरणामुळे उद्योगांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो .
त्यामुळे दोन्ही देशांनी व्यवसायासाठी अधिक विश्वासार्ह वातावरण करण्यावर भर द्यावा , असे त्यांनी नमूद केले . गोर यांनी निर्यात नियंत्रणाबाबतही खुले आणि विश्वासावर आधारित चर्चेचे समर्थन केले . भारत अंडी अमेरिका तंत्रज्ञान , संरक्षक , ऊर्जा तसेच महत्वाच्या खजिन्याच्या क्षेत्रात सहकार्य वाढवत असताना व्यापारातील अडथळे कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले .
Pew Research Center : अमेरिकेत भारतीयांची प्रतिमा किती सकारात्मक? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे
भारतामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या अनेक जागतिक कंपन्यांसाठी बौद्धिक संपदा हक्काचे संरक्षण हा महत्वाचा मुद्दा असल्याचे गोर यांनी सांगितले . भारतात आपले तंत्रज्ञान , संशोधन आणि व्यवसाय सुरक्षित राहतील का , असा प्रश्न अनेक कंपन्या उपस्थित करतात . या संधर्भात भारतावर विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले . बौद्धिक संपदा हक्कांचे मजबूत संरक्षण आणि पारदर्शक नियमांमुळे अधिकाधिक कंपन्या भारतात गुंतवणूक , उत्पादन व विस्तार करण्यास पुढे येऊ शकतात . यामुळे भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला तसेच रोजगारनिर्मितीलाही फायदा होण्याची शक्यता आहे .
गोर यांनी भारत आणि अमेरीका व्यापारातील वाढीवरही प्रकाश टाकला . गेल्या दोन दशकात दोन्ही देशांमधील वस्तू आणि सेवांचा व्यापार सुमारे २० अब्ज डॉलरवरून वाढून २४० अब्ज डॉलर पर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले . आता २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य दोन्ही देशांसमोर आहे .
Pakistan News : इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता; सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश
हे लक्ष्य साध्य करण्यासाठी बाजारपेठेतील प्रवेश वाढवणे , पुरवठा साखळी मजबूत करणे , महत्वाच्या तंत्रज्ञानात सहकार्य वाढवणे आणि गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे . भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम केल्यास सेमीकंडक्टर , संरक्षण , ऊर्जा , तंत्रज्ञान आणि महत्वाच्या खजिन्याच्या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात . असा विश्वास गोर यांनी व्यक्त केला . त्यामुळे व्यापारातील मतभेद बाजूला ठेवून दोन्ही देशांनी आर्थिक भागीदारीला अधिक बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले .