
India's Two Oil Tankers Safely Navigated Through Hormuz
मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम पदार्थांनी भरलेली दोन भारतीय व्यापारी जहाजे ‘होर्मुझची सामुद्रधुनीतून बाहेर पडली आहेत. सध्या ही जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली असून नौदलाच्या कडेकोट सुरक्षेत आहेत. भारताच्या ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत जहाजांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय नौदल पर्शियन गल्फ आणि ओमानच्या आखातात तैनात करण्यात आले होते.
नौदलाचे अधिकारी ड्रोन आणि सॅटेलाइटच्या माध्यमातून या मार्गावर २४ तास लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जहाजांना मदत करण्यासाठी ‘मार्कोस’ (MARCOS) कमांडो आणि तांत्रिक पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आणखी काही जहाजे या मार्गावरुन नौदलाच्या सुरक्षेत बाहेर पडतील असे सरकारने म्हटले आहे.
भारताला इराण(Iran)कडून मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु हा भारताचा कुटनीतिक विजय मानला जात आहे. युद्ध सुरु झाल्यापासून भारत सतत इराणच्या संपर्कात आहे. भारताने इराणला संयम बाळगण्यास सांगितले आहे तर भारतीय जहाजांच्या सुरक्षेचीही मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्री मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्याशी चर्चा केली होती.
ज्यानंतर इराणने भारत आणि इतर ४ मित्र राष्ट्रांसाठी होर्मुझचा मार्ग खुला केला. हा भारतासाठी मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, भारतासारख्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांना या मार्गावरून जाण्यास कोणताही अडथळा येणार नाही.
भारताची ८० टक्के उर्जा संसाधने होर्मुझच्या मार्गावरुन आयात केली जातात. देशांतर्गत एलपीजी, डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून हा मार्ग खुला असणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या या मार्गावर सुरु असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत इंधन दर वाढण्याची शक्यता आहे. पण या संकटाच्या काळात इराणने भारताला दिलेल्या सवलतीमुळे इंधन दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
Ans: होर्मुझ सामुद्रधुनी हा जगातली सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूकीचा मार्ग आहे. या मार्गावरुन भारताचे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी यांसारख्या उर्जा संसाधनांचे मोठ्या प्रमाणावर आयात होते. यामुळे हा मार्ग भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
Ans: होर्मुझमधून तेल आणि गॅस जहाजे सुरक्षित आणण्यासाठी भारत सरकारने इराणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. एस. जयशंकर यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी चर्चा केली असून भारतीय जहाजांना होर्मुझ मार्ग खुला करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जहाजे होर्मुझमधून सुरक्षित बाहेर आल्यानंतर फासरच्या आखातात नौदल सैन्याच्या निगराणीत ठेवण्यात आली आहेत.
Ans: इराणने भारतासह चीन, रशिया, यांसारख्या मित्र राष्ट्रांसाठी होर्मुझचा मार्ग खुला केला आहे. परंतु या देशांच्या जहाजांना इराणशी समन्वय साधून क्लिअरन्स मिळवणे आवश्यक असल्याचे IRGC ने म्हटले आहे.