फोटो सौजन्य AI
IRGC म्हणते कि इराण आणि ओमान मध्ये जहाजांच्या वाहतुकीसंदर्भात चर्चा सुरु आहे . मात्र याचा अर्थ असा नाही कि होर्मूझ पूर्णपणे खुली केली जाईल . अंतिम निर्णय अमेरिकेसोबतच्या व्यापक समझोत्याशी जोडलेला आहे . हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे कारण होर्मूझ हा जगातील सर्वात महत्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे . त्यामुळे त्यातील वाहतुकीवर निर्बंध राहिल्यास जागतिक ऊर्जा बाजारावर दबाव कायम राहू शकतो .
अमेरिका आता कितीही चर्चा करायला तयार असली तरी इराण ने वारंवार स्पष्ट केले आहे कि , जोपर्यंत अमेरिका आमच्या सर्व अटी मान्य करणार नाही तोपर्यंत चर्चा शक्य नाही . तसेच मागील काही दिवसांपूर्वी इराणच्या एका नेत्याने इअरण ने हे युद्ध जिंकले असल्याचे विधान केले आहे . हे विधान राजकीय अनेक अर्थ इराणच्या बाजूने युद्ध गेल्याचे संकेत देत आहेत . असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे .
इराण अमेरिका युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर होर्मूझ मधून इराण ने सांगितलेल्या रस्त्याने जहाजे जायला लागली पण काही जहाजांनी अमेरिकेकडून सूचना घेऊन होर्मूझ पार करायला सुरवात केली . तेव्हा इराण ने त्या जहाजांवर हल्ला चढवला . आणि पुन्हा अमेरिकेने इराणवर हल्ले चढवले . तेव्हा नंतर आज पर्यंत अमेरिकेने सुरु केलेले हल्ले आणि त्याला प्रतिकार करत इराण ने इतर आखाती देशांवर हल्ले केले .
World News : ४२ वर्षांनंतर काँगोमध्ये जनगणना; कोट्यवधींची पुन्हा होणार मोजदाद!
यामध्ये हुती आले , इराक मधील इराण समर्थक आले , लाल समुद्र बंद झाला , असे करत करत युद्धाची व्याप्ती वाढली आणि याचा फटका इराण सोबतच अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांना बसला . त्यामुळे अमेरिकेवर आता सवर्च स्तरावरून प्रचंड दबाव येत आहे . इराणसोबत चर्चा करून पुन्हा युद्धशान्ती निर्माण करायला अमेरिका तयार आहे पण आता मात्र इराण आपल्या आटी मान्य केल्याशिवाय आपण कोणत्याही चर्चा करणार नसल्याचे सांगितले आहे . आणि घोडे आता इथेच पडल्याचे जाणकार सांगत आहेत .






