लंडन : पंजाबमध्ये अमृतपाल सिंग (Amrutpal Singh) याच्या विधानांनंतर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. त्याचे पडसाद थेट लंडनमध्ये उमटले असून तेथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी आंदोलन (Khalistani Attack On Indian High Commission Office Flag) केलं आहे. या समर्थकांनी कार्यालयाबाहेरच्या भारतीय राष्ट्रध्वज अर्थात तिरंग्याचाही अपमान केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी अमृतपाल सिंग याच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकारावर भारत सरकारनं (Indian Government) ब्रिटनला सुनावलं आहे.
[read_also content=”गॅँगस्टरने आता ईमेलवरून दिली सलमान खानला धमकी, गॅलॅक्सीवर वाढला पोलिसांचा पहारा, मुंबई पोलिसांची उडाली झोप https://www.navarashtra.com/movies/salman-khan-security-increased-after-threatening-via-email-nrsr-377220.html”]
लंडनमध्ये काही कथित खलिस्तानी समर्थकांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनादरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केला. या आंदोलनादरम्यान भारताचा राष्ट्रध्वज खाली उतरवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. मात्र, वेळीच भारतीय उच्चायुक्ताच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
#WATCH | United Kingdom: Khalistani elements attempt to pull down the Indian flag but the flag was rescued by Indian security personnel at the High Commission of India, London.
(Source: MATV, London)
(Note: Abusive language at the end) pic.twitter.com/QP30v6q2G0
— ANI (@ANI) March 19, 2023
या घटनेचा भरत सरकारकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर याविषयीची प्रेस रिलीज शेअर केली आहे. “ब्रिटनच्या भारतातील सर्वात ज्येष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश भारत सरकारने दिले आहेत. लंडनमधील प्रकाराबद्दल भारतानं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे”, असं यात लिहिलं आहे.
India lodges strong protest with UK.
Press Release ➡️ https://t.co/Apz9tgy1Ki pic.twitter.com/PV2VyUw1Lt
— Arindam Bagchi (@MEAIndia) March 19, 2023
सुरक्षेत कुचराई केल्याबद्दल नाराजी
यावेळी भारत सरकारने ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांकडून भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षेत झालेल्या कुचराईबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे. “या आंदोलकांना भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालय परिसरात येण्यापासून थांबवण्यात आलं नाही. त्यावेळी ब्रिटिश सुरक्षा पूर्णपणे अनुपस्थित होती. यासंदर्भात व्हिएन्ना करारानुसार ब्रिटिश सरकारच्या कर्तव्याची जाणीव या ब्रिटिश अधिकाऱ्यांना करून देण्यात आली आहे”, असंही भारत सरकारकडून कळवण्यात आलं आहे.
ब्रिटिश सरकारची उदासीनता
“भारतीय उच्चायुक्त कार्यालय परिसर आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेबाबत ब्रिटिश सरकारची उदासीनता भारताला अस्वीकारार्ह आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही. यावर ब्रिटिश सरकार तातडीने पावलं उचलून योग्य ती कारवाई करेल अशी अपेक्षा आहे. संबंधितांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी आणि त्यांच्यावर योग्य त्या नियमानुसार कायदेशीर शिक्षाही केली जावी”, असंही परराष्ट्र विभागाकडून ब्रिटिश सरकारला सांगण्यात आलं आहे.