
Middle East Conflict India Deploys Warship in Oman Gulf
भारताने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि समुद्रात भारताच्या व्यापाराचे रक्षण करण्यासाठी मिशन डिप्लोयमेंट सुरु केले असून ओमानच्या आखातात आपली अत्याधुनिक युद्धनौका INS सूरत तैनात केली आहे.
सध्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. परिस्थिती अत्यंत भयंकर होत चालली असल्याने भारताने आपली युद्धनौका ओमानच्या आखातात तैनात केली आहे. भारत आपल्या नागरिकांचे आणि आर्थिक हिंताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.
मध्यपूर्वेत सध्या तिसऱ्या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इस्रपायलने इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले आहे, तर इराणने देखील आखाती देशात अमेरिकेला मिसाइल व ड्रोनने घेरले आहे. यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे. लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेविरोधातही इस्रायलचे युद्ध सुरु आहे.
Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण
Ans: मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गरज पडल्यात त्यांची सुका करण्यासाठी भारताने ओमानच्या आखातात युद्धानौका तैनात केली आहे.
Ans: INS सूरत हे अत्याधुनिक गाईडेड मिसाईल डेस्ट्रॉयर असून यामध्ये मध्य पल्ल्याचे आकाश क्षेपणास्त्र, ब्रह्मोस अँटी-शिप मिसाइल्स, प्रगत रडार प्रमाली आणि पाणबुडीविरोधात शस्त्रसज्जता आहे. हे जहाज शत्रूच्या रडारपासून वचाव कार्यात सक्षम आहे.