इराण इस्रायल मध्य पूर्व युद्धाच्या परिस्थितीमध्ये दुबईहून भारतीय मुंबईत परतले (फोटो - AI)
इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु झाल्याने याचा विपरित परिणाम हवाई उड्डाणांवर झाला आहे. यामुळे विमान सेवा ठप्प पडली आहे. तसेच आखाती देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. तसेच दुबई विमानतळही बंद करण्यात आले होते आणि अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यामुळे विमानतळांवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. तसेच हजारो भारतीय पर्यटक हे या देशांमध्ये अडकले होते. या सर्वांना सुरक्षित भारतामध्ये परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय पूर्ण प्रयत्न करत होते. अखेर प्रवाशांना घेऊन पहिले विमान मुंबईमध्ये दाखल झाले आहे.
हे देखील वाचा : इराणचा ‘विनाशकारी सूड’! खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेवर पलटवार सुरुच; सौदीतील दूतावासावर हल्ला
Israel and US VS Iran : मध्यपूर्वेतील युद्धाने विनाशका
युद्धजन्य अशा परिस्थितीत काल रात्री सुमारे दोन वाजता दुबईहून एक फ्लाइट मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी प्रवाशांनी त्यांच्यावर आलेले आपबीती सांगितली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे दुबईहून आलेले विमान पोहचले आहे. यावेळी अजय नावाच्या एका प्रवाशाने त्याचा दुबईचा थरारक अनुभव सांगितला. तो म्हणाला की, “आम्ही मुंबईहून हैदराबाद आणि तेथून दुबईला पोहोचलो होतो. दुबईहून आमची पुढील फ्लाइट अमेरिकेसाठी होती. आम्ही सर्वजण विमानात बसलोही होतो. जेव्हा विमानाने उड्डाण घेतले नाही तेव्हा चौकशी करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे 7-8 तास निघून गेले. त्यानंतर आम्हाला सांगण्यात आले की युद्ध सुरू झाले आहे, त्यामुळे सध्या उड्डाण करता येणार नाही,” अशी माहिती प्रवासी अजयने दिली आहे.
पुढे तो म्हणाला की, “त्यानंतर विमानतळावर मोठी धावपळ उडाली. परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती. त्यानंतर एमिरेट्सच्या बसेस आणि गाड्या विमानतळावर आल्या आणि आम्हाला हॉटेलपर्यंत सोडण्यात आले. मात्र त्यानंतरही आम्ही संपूर्ण रात्र हॉटेलच्या शोधात भटकत राहिलो. 10-12 तास भटकल्यानंतर आम्हाला एक हॉटेल मिळाले. या दरम्यान आम्ही बॉम्बस्फोटांचे आवाजही ऐकले. तसेच बुर्ज खलिफा परिसरात धुराचे लोटही पाहिले. या काळात आम्हाला हॉटेलमधून बाहेर पडण्यास आणि खिडक्यांजवळ उभे राहण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. आम्ही जेवण न करता फक्त आमच्या खोलीतच थांबत होतो. बाहेर नेमके काय सुरू आहे,” याची आम्हाला काहीच माहिती नव्हती, असे भारतीय प्रवाशांनी सांगितले आहे.
हे देखील वाचा : Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ
संबंधित प्रवाशाने सांगितले की, “हॉटेलमध्ये जागा न मिळाल्यामुळे अनेकजण जिथे जागा मिळेल तिथे राहत होते. दुबईतील सध्याच्या परिस्थितीबाबत सांगितले की, आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र दोन दिवस परिस्थिती अत्यंत गंभीर होती. आता तेथील लोक थोडे निश्चिंत झाले आहेत. मुंबईकडे येणाऱ्या फ्लाइटची माहिती मिळताच आम्ही एमिरेट्सकडे विनंती केली. त्यानंतर आम्हाला वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली आणि आम्ही आमची फ्लाइट पकडली,” अशी माहिती अजयने दिली आहे.






