
युद्धाच्या संकटात भारताला मोठा दिलासा; कच्च्या तेलाची चिंता तूर्त मिटणार, रशिया देणार मदतीचा हात...
मॉस्को : अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. या हल्लयांमुळे या तीनही देशांत परिस्थिती अस्थिर झाली आहे. आता या संघर्षाचा परिणाम भारतावरही होत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या लष्करी तणावामुळे, तेल पुरवठ्यात संकट येण्याची चिन्हे आहेत. भारताकडे सध्या फक्त 25 दिवसांचा कच्चा तेलाचा साठा आहे. त्यामुळे येत्या काळात इंधन तुटवडा होणार असल्याची चिन्हे असतानाच रशियाने भारताला मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या लष्करी तणावाचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होत आहे. दरम्यान, रशियाने भारताला एक महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. जर पश्चिम आशियातून तेल पुरवठ्यावर परिणाम झाला तर रशिया भारताला अंदाजे ९.५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल पाठवण्यास तयार असल्याचे रशियाने म्हटले आहे. हे पाऊल अशा वेळी उचलले आहे जेव्हा भारताच्या तेल पुरवठ्यात संकटाचे संकेत दिसत आहेत आणि देशाचे साठे मर्यादित आहेत.
हेदेखील वाचा : US Iran War: श्रीलंका किनारपट्टीवर खळबळ ! रडारवर आलेले इराणी जहाज पाणबुडी हल्ल्यात उद्ध्वस्त; ८० जणांचा मृत्यू तर…
भारताची परिस्थिती देखील संवेदनशील मानली जात आहे कारण सध्या देशात फक्त २५ दिवसांचा कच्चा तेलाचा साठा आहे. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सारख्या इंधनांचा साठा देखील मर्यादित असल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत, जर पश्चिम आशियातून पुरवठा विस्कळीत झाला तर भारताला तातडीने पर्यायी स्रोतांची आवश्यकता असू शकते. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, रशियाने भारताला अतिरिक्त तेल पुरवण्याची ऑफर दिली आहे.
पश्चिम आशियातील संकटाचा तेल पुरवठ्यावर परिणाम
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील परिस्थिती झपाट्याने बिघडत आहे. त्यानंतर इराणकडून प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे सागरी मार्गांना धोका वाढला आहे. जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यात मार्गांपैकी एक मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीभोवती परिस्थिती विशेषतः तणावपूर्ण आहे. भारत या मार्गाने आपल्या कच्च्या तेलाच्या सुमारे 40 टक्के आयात करतो. परिणामी, हा मार्ग जवळजवळ बंद झाल्यामुळे भारताला पर्यायी स्रोत शोधण्यास भाग पाडले आहे.