
sipri report 2026 india overtakes pakistan nuclear weapons stockpile defense updates
India Pakistan Nuclear Stockpile Comparison : जागतिक राजकारणात (India Pakistan Nuclear Stockpile) आणि विशेषतः दक्षिण आशियाई देशांमध्ये सध्या लष्करी आणि आण्विक संरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठी खळबळ उडाली आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्था म्हणजेच ‘सिप्री’ (SIPRI) चा ताजा अहवाल समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. भारताच्या सातत्याने वाढणाऱ्या सामरिक आणि लष्करी ताकदीची पाकिस्तानने केवळ जाहीर कबुलीच दिली नाही, तर भारताची अण्वस्त्र निर्मिती क्षमता आता धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याचे सांगत जागतिक समुदायाकडे चिंता व्यक्त केली आहे. वारंवार भारताला अण्वस्त्रांची आणि युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानचा सूर आता पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे.
सिप्री या आंतरराष्ट्रीय संस्थेने जगभरातील अण्वस्त्रांचा आढावा घेणारा आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या मूल्यांकनानुसार, भारताच्या अण्वस्त्र साठ्यात गेल्या एका वर्षात तब्बल १० नवीन अण्वस्त्रांची भर पडली असून भारताचा एकूण साठा आता १९० वर पोहोचला आहे. याउलट, आर्थिक आणि राजकीय संकटात सापडलेल्या पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा गेल्या वर्षीइतकाच म्हणजेच १७० वर थबकला आहे. केवळ दोन वर्षांपूर्वीपर्यंत पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे होती, परंतु भारताने अत्यंत वेगाने आणि गुप्ततेने आपले धोरण बदलत आण्विक क्षमता मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याच अहवालात चीनकडे ६२० अण्वस्त्रे असल्याचे सांगण्यात आले आहे, जी संख्या भारताच्या तुलनेत जास्त असली तरी भारताचा सध्याचा वेग चीनलाही विचार करायला लावणारा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : अमेरिकेच्या ‘मिशन होर्मुझ’ला भारताचा थेट नकार; पाश्चात्त्य देशांच्या दबावानंतरही पंतप्रधान मोदींचा बाणेदारपणा
सिप्रीचा हा अहवाल समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी एक अधिकृत निवेदन जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “सिप्रीने जाहीर केलेली आकडेवारी ही केवळ प्राथमिक अंदाज असू शकते. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती पाहता, भारताचा वास्तविक अण्वस्त्रसाठा या अंदाजांपेक्षा कितीतरी पटीने अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.” पाकिस्तानने भारताच्या लष्करी आधुनिकीकरणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, भारताच्या वाढत्या संरक्षण बजेटमुळे आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या खरेदीमुळे दक्षिण आशियातील शक्तीचा समतोल (Balance of Power) पूर्णपणे बिघडला असल्याचा कांगावा आता इस्लामाबादकडून केला जात आहे.
SIPRI: INDIA HAS ADDED TO ITS NUCLEAR ARESENAL
Latest SIPRI report:
+ India boosted Nuclear arsenal in year of strife, OP Sindoor.
+ World’s 5th largest military spender ($92.1 bn in 2025)
+ 2nd largest arms importer globally (2021-25)
+Imported nearly 2x more major arms than… pic.twitter.com/QIBXb8QU6M — Rahul Shivshankar (@RShivshankar) June 8, 2026
credit – social media and Twitter
पाकिस्तानने आपल्या निवेदनात भारताच्या ज्या काही विशिष्ट तंत्रज्ञानाचा उल्लेख केला आहे, त्यावरून भारताने संरक्षणाच्या क्षेत्रात मारलेली भरारी स्पष्ट होते. पाकिस्तानने म्हटले आहे की, भारताच्या क्षेपणास्त्र प्रणालींचे ‘कॅनिस्टरायझेशन’ (Missile Canisterisation) वेगाने होत आहे. कॅनिस्टरायझेशन म्हणजे क्षेपणास्त्रे अत्यंत सुरक्षित आणि तात्काळ डागता येतील अशा विशेष कंटेनरमध्ये साठवून ठेवणे. या तंत्रज्ञानामुळे भारताला अत्यंत कमी वेळेत, अगदी काही मिनिटांत शत्रूवर अणुहल्ला करणे शक्य झाले आहे. याशिवाय, भारताने समुद्रात तैनात केलेल्या अण्वस्त्रधारी पाणबुड्या (Nuclear Submarines) आणि लांब पल्ल्याच्या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा (ICBMs) विकास यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Strait Of Hormuz : भारताचा अमेरिकेला थेट इशारा; ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशांवर हल्ले का? MEA ने बजावला ‘डिमार्च’
या संपूर्ण वादात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताची ‘न्यूक्लियर ट्रायड’ (Nuclear Triad) क्षमता होय. भारत आता जगातील अशा मोजक्या देशांमध्ये सामील झाला आहे जे जमिनीवरून, हवेतून (फायटर जेट्सद्वारे) आणि अथांग समुद्राच्या पोटांतूनही शत्रूवर अण्वस्त्रे डागू शकतात. पाकिस्तानकडे सध्या अशी तिहेरी आणि पूर्ण विकसित यंत्रणा उपलब्ध नाही. समुद्रातून होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करणे कोणत्याही देशासाठी अत्यंत कठीण असते आणि भारताची हीच अजेय क्षमता पाकिस्तानला अस्वस्थ करत आहे. स्वतःला असुरक्षित दाखवून आंतरराष्ट्रीय स्तरावर सहानुभूती मिळवण्यासाठी पाकिस्तानने आता जगातील प्रगत देशांना आवाहन केले आहे की, त्यांनी भारताला आधुनिक लष्करी तंत्रज्ञान पुरवणे बंद करावे, अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रादेशिक सुरक्षेवर होतील.