
Car Care Tips
Car Driving Tips : घाटात गाडी चालवताय? सावधान, ‘हे’ नियम पाळले नाहीत, तर यमराजही वाचवू शकणार नाही
गाडी थांबवण्यासाठी ब्रेक पॅड्स अत्यंत महत्त्वाचे असतात. यामुळे २५ ते ४० किलोमीटरनंतर ते बदलने गरजेचे असते. जर ब्रेक लावताना कारमध्ये चीं-चीं असा कर्कश आवाज आला तर ब्रेक पॅड्स घासले गेले समजावे. यशिवाय ब्रेक मारताना पायाला कंपने जाणवली किंवा गाडी थांबण्यास जास्त वेळ लागला तर याकडे दुर्लक्ष करु नये. ब्रेक निकामी झाल्याचे हे संकेत आहेत. यामुळे तातडीने ब्रेक पॅड्स दुरुस्त करुन घ्यावेत.
टायर ४० ते ६० हजार किलोमीटर नंतर किंवा ४ ते ५ वर्षानंतर बदलावेत. टायरला तडा गेला असेल, बाजुला फुगवटा आला असेल तर तातडीने यार बदलावा. याशिवाय सतत टायरची हवा जात असेल तर ते खराब झाल्याचे लक्षण आहे. खास करुन पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कारण पावळ्यात गुळगुळीत रस्त्यामुळे टार घसरु शकतात. यामुळे अपघात होऊ शकतो. तसेच गाडी चालवताना टायरचा आवाज वाढला तर वेळीच चेक करुन घ्या.
बॅटरीशिवाय तुमची कार सुरु होऊ शकत नाही. कारच्या बॅटरीचे आयुष्य साधरण ३ ते ५ वर्षाचे असते. जर गाडी लवकर सुरु होत नसेल किंवा हेडलाईट्सची लाईट कमी झाली असेल तर बॅटरी खराब होत चालल्याचे समजावे. याशिवाय बॅटरिच्या टर्मिनलवर पांढरी किंवा निळी पावडर जमा झाली असल्यास ती त्वरीत बदलावी.
कार चालवताना येणारे छोटे छोटे आवाज, किंवा बदल हे सर्व्हिसंगसाठी वॉर्निंग साइन्स आहेत. यामुळे वेळेवर सर्व्हिसिंग करा. खराब पार्ट्स बदलून तुमची गाडी आणि तुम्हीही सुरक्षित राहाल. यामुळे या वॉर्निंग साइन्सकडे दुर्लक्ष करु नका.