
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेनंतर EV इंडस्ट्रीवर कोणता परिणाम होईल? जाणून घ्या
भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Budget 2026 सादर केला असून, या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांचा फायदा विविध क्षेत्रांना होणार असून, ऑटोमोबाईल सेक्टरसाठी, विशेषतः इलेक्ट्रिक वाहनांबाबत (EV) मोठी घोषणा करण्यात आली आहे. या बजेटमध्ये ईव्हीसाठी नेमकं काय जाहीर करण्यात आलं आहे? चला याबद्दल जाणून घेऊयात.
परदेशात नवीन युनिट्स येईना अन् भारतात ग्राहकच मिळेना! Maruti Suzuki च्या ‘या’ कारची बातच न्यारी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत Budget 2026 मांडला. या बजेटमध्ये भविष्यातील विकासाला गती देणाऱ्या अनेक योजना आणि तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑटोमोबाईल उद्योगासाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री यांनी आपल्या बजेट भाषणात सांगितले की, बॅटरीसाठी लिथियम-आयन सेल उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंवर (Capital Goods) दिली जाणारी मूलभूत सीमा शुल्क सवलत आता बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसाठी लिथियम-आयन सेल उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंनाही लागू करण्यात येणार आहे.
Budget 2026: यंदाचे बजेट EV खरेदीदारांना ‘अच्छे दिन’ आणणार? इलेक्ट्रिक वाहन स्वस्त होण्याची शक्यता
तज्ज्ञांच्या मते, या घोषणेमुळे देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा ग्राहकांसह वाहन उत्पादकांनाही होणार आहे.
कोणत्याही इलेक्ट्रिक वाहनाच्या एकूण किमतीपैकी सुमारे 40 ते 50 टक्के हिस्सा बॅटरीचा असतो. सरकारच्या या निर्णयामुळे बॅटरीची किंमत कमी होऊ शकते आणि त्याचा थेट परिणाम सर्व प्रकारच्या ईव्हींच्या किमतींवर दिसून येईल.
भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक वाटा इलेक्ट्रिक दुचाकींचा आहे. या सेगमेंटमध्ये अनेक कंपन्या विविध प्रकारची ईव्ही मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहेत.