• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Article About Ganeshotsav And Cinema Relation Nrsr

विवेकाने जगण्याचे सामर्थ्य दे

बघता बघता २०२२ मधले बाप्पा आता येण्याचे वेध लागले आहेत. गेल्या वर्षीही प्रत्येकाच्या घरी बाप्पा आले होतेच. पण तसाही गेल्या वर्षावरही कोरोनाची छाया होती. आता हे वर्ष खरंतर सुटकेचं ठरेल यात शंका नाही. कारण, दरवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पा वाजत गाजत येतील. त्यांच्या मिरवणुका निघतील.. मिरवणुका आल्या की गाणी आली.. गाणी आली की नाच आला. जिथे जिथे नाच-गाणं असतं तिथे येतो आपल्या सगळ्यांचा लाडका सिनेमा. कारण, सिनेमाचा मोठा प्रभाव जनमानसावर आहे. त्यात गणपती बाप्पा आणि सिनेमाचं नातंही जुनं.. आणि तितकंच एकमेकांत विरघळलेलं.

  • By Ganesh Mate
Updated On: Aug 28, 2022 | 06:00 AM
deva-shree-ganesha
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सिनेमाचा विषय निघाला की दरवेळी एक वाद ठरलेला असतो. तो असा की सिनेमा या माध्यमावर समाजाचा पगडा आहे की समाजावर सिनेमा या माध्यमाचा. काहींना पहिली बाजू बरोबर वाटते तर काहींना दुसरी. अर्थात उत्तर काही असो पण या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खरंतर भारतीय समाजमनावर आणि त्यातही जिथे हिंदी-मराठी सिनेसृष्टी रुजली त्या मुंबईत-महाराष्ट्रात तर गणेशोत्सव प्रेमाचा आणि आपुलकीचा आहे. या उत्सवाची समाजमनावर असलेली पकड लक्षात घेऊनच हा उत्सव सिनेमात आला. बाप्पाबद्दल लोकांच्या मनात असलेला सॉफ्ट कॉर्नर लक्षात घेऊन सिनेमेकर्सनी गणपती बाप्पाला सिनेमात घेतलं. अर्थात ही आत्ताची बात नाहीये. अगदी १९२५ मध्ये.. म्हणजे जेव्हा बोलपटही आले नव्हते तेव्हा ‘गणेशा उत्सव’ या नावाचा एक मूकपट आला होता. त्यात गणपती बाप्पाची आरती आणि बाप्पाचं काही फुटेज होतं. त्यावर सिनेमा करण्याचं कारण असं की त्यावेळी सिनेमा हे माध्यम खरंतर नवं होतं. त्यावेळी लोकांना या माध्यमाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी.. त्यांच्या मनात असलेली भीती जावी हा त्यामागचा खरा हेतू होता. शिवाय कला म्हणूनही सिनेमाकडे पाहिलं जाऊ लागलं होतंच. कलांची देवता मानलेला बाप्पा सिनेमात आला तर त्याचा आशीर्वाद त्या सिनेमाला मिळेल अशीही श्रद्धा त्याकाळी असावी. पुढे १९३६ मध्ये ‘पुजारन’ या सिनेमातही बाप्पा दिसले. असे कित्येक सिनेमे आहेत. म्हणजे अगदी अलिकडे एनिमेशनवर आलेला ‘माय फ्रेंड गणेशा’ या चित्रपटांपर्यंत ही यादी मोठी होते. त्याशिवाय अग्निपथ, शोर इन द सिटी, एबीसीडी, वास्तव, सत्या अशा बऱ्याच सिनेमांमध्ये बाप्पा दिसतात. मराठी सिनेसृष्टीही याला अपवाद नाहीय. ‘मोरया’सारखा चित्रपट अवधूत गुप्ते यांनी दिला तो गणेशोत्सवावर बेतलेला. सांगण्याचा मुद्दा असा की चित्रपटात बाप्पा वारंवार दिसत राहातो. कारण तो विघ्नहर्ता आहे. मग सिनेमात बाप्पा आला की त्यात त्याच्यावरचं एखादं गाणंही हमखास येतं. मग तीच गाणी पुढे गणेशोत्सवात वाजू लागतात. ते साहजिकच आहे. कारण कलांचा अधिपती म्हणत असताना त्यात नृत्य, नाट्य, संगीत आदी सर्वच कला येतात. खरंतर आता बाप्पावरचे चित्रपट आणि बाप्पा ज्या चित्रपटात आहे अशांची नावं काढायची म्हटली तर त्यासाठी गुगल आहेच की. पण आपण त्यापलिकडे विचार करायला हवा. कारण, जसा हा देश आपला आहे.. तसं हे राज्यही. आणि राज्य आपलं असल्यामुळे त्या राज्यातली सगळी शहरं, गावं.. त्यात राहणारी माणसंही आपलीच. प्रत्येक मराठी घरात हाच संस्कार रुजत असतो. त्यामुळेच येणारा बाप्पा ही आपला बाप्पा असतो. इथंच आपण थोडं विचार करण्याची गरज आता येऊन ठेपली आहे की काय असं वाटत राहतं. यंदाचा गणेशोत्सव महत्वाचा आहे तो त्यासाठी.

आपल्या बाप्पावर.. त्याच्या अस्तित्वावर आपली गाढ श्रद्धा आहे. सर्वंच कलांनी ज्याच्यासमोर शरणागती स्वीकारली आहे असा तो देव.. गणपती. आपल्या महाराष्ट्रात कोणत्याही कलेची सुरूवात होताना गणरायाचं पूजन होतं. कारण महाराष्ट्राने कलेवर अपार प्रेम केलं आहे. तसं कलाकारावरही महाराष्ट्र प्रेम करतो. हे चित्र भारताला माहीत आहेच. असं असताना आजच्या बदलत्या काळात याच खात्रीला कात्री लावण्याच काम होताना दिसतं. ज्या सिनेमाने गणरायावर अपार प्रेम केलं त्याच सिनेमाला.. त्याच्या सिनेमेकर्सना बॉयकॉट करण्याचा नवा ट्रेंड महाराष्ट्रात रुजला आहे. अलिकडे त्याचा प्रत्ययही आला. आमीर खानच्या ‘लालसिंग चड्ढा’वर बॉयकॉट करण्याची मोहीम चालवली गेली. अर्थात हे काही पहिल्यांदा झालेलं नाही. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर घराणेशाहीच्या नावाखाली बोटं मोडणाऱ्याची नवी जमात उदयाला आली. आणि त्यांनी नेपोटिझमवर यथेच्छ सूड उगवला. यातून करण जोहर सुटला नाही आणि बच्चन कुटुंबीयही सुटले नाहीत. हा ट्रेंड गेली दोन वर्षं चांगला चालू होता. पण आता त्याही वरची कडी गाठत सिनेमाच न बघण्याबद्दल सुचवलं जाऊ लागलं आहे. काही महिन्यांपूर्वी पावनखिंड, झुंड आणि काश्मीर फाईल्स या तीन चित्रपटांबद्दल असंच वादळ उठवलं गेलं होतं. यातून ना नागराज मंजुळे सुटला, ना दिग्पाल लांजेकर. मराठी दिग्दर्शकांचे हे दोन्ही सिनेमे असताना या सिनेमांना जातीपातींनी वाटून घेतलं. कुणाचा सिनेमा मोठा आणि कुणाचा सिनेमा आपला.. यात वाद रंगले. सोशल मीडियाने या महत्वाची भूमिका बजावली होती.

एखादा सिनेमा पाहिल्यानंतर तो न आवडणं हे फार साधं फिलिंग आहे. जसा एखाद्याला एखादा सिनेमा आवडतो तसाच तो नावडू शकतो. आजवर हेच होतं आलं आहे. पण असं असताना अमुक सिनेमा बघितला तर.. आणि तमुक सिनेमा नाही बघितला तर.. अशा अटी शर्तींसह जेव्हा सिनेमावरची काळी सावली गडद होऊ लागली तेव्हा मात्र हे विघ्न मोडून काढायला आता साक्षात बाप्पांनीच यायची गरज आहे हे वाटू लागलं. खरंतर लॉकडाऊनच्या चटक्यांपासून सिनेमाही सुटलेला नाही. प्रत्येकाला आता पुन्हा नव्याने सिद्ध व्हायचं आहे. असं असताना, आपण सिनेमा मोठा करायचा सोडून एकमेकांमधली उणीदुणी काढू लागलो आहोत, हे यापूर्वी कधी महाराष्ट्रानेही पाहिलं नव्हतं, ना त्या विघ्नहर्त्यानेही. कला ही कला असते. कोणतीही कला व्यक्त व्हायचं माध्यम असते आणि पाहणाऱ्यासाठी एक अनुभूती. या दोन्हीकडे सजगपणे पाहण्याची गरज आज येऊन ठेपली आहे. लालसिंग चढ्ढा नसेल चांगला तर तो नाहीच चालणारा. पण ते लोक ठरवू देत. त्यासाठी त्यांना जो विचार करायचा आहे तो करायला वेळ मिळू देत. उरला प्रश्न आमीरसारख्यांचा… तर आमीरची काही स्टेटमेंट्स आपण पुन्हा काढून पाहण्याची गरज येऊन ठेपली आहे. कारण हा तोच आमीर आहे ज्याने महाराष्ट्रातल्या कित्येक गावांमध्ये पाणी आणलं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दलचं आपलं वाटणं इतकं साधं.. आणि हलकं असू नये.

यंदाचा गणेशोत्सव म्हणून महत्वाचा आहे. लॉकडाऊननंतर आपल्या सगळ्यांना नवा जन्म मिळाला आहे. ही नवी सुरूवात करताना बाप्पाला वंदन करणं तर आलंच. पण सोबत आपण ज्या गोष्टी करतो आहोत.. करणार आहोत.. त्या सगळ्या बाप्पाला साक्षी ठेवून पुन्हा एकदा तपासण्याची गरज निकट येऊन ठेपली आहे. तसं केलं तरच बुद्धीदेवता असलेला बाप्पा आपल्याला पावला असं म्हणायला वाव उरेल. यंदा आपल्या घरी येणाऱ्या बाप्पाच्या साक्षीने आपल्या सगळ्यांमधला विवेक आणखी सजग होवो.. याच गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया.
– सौमित्र पोटे
sampote@gmail.com

Web Title: Article about ganeshotsav and cinema relation nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • film news
  • Ganeshotsav
  • Ganeshotsav 2022

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बॉलीवूड अभिनेता Sunny Deolच्या ‘गबरू’ चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Feb 17, 2026 | 04:42 PM
Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर

Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर

Feb 17, 2026 | 04:40 PM
Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Shiv Jayanti 2026: वर्षातून 3 वेळा का साजरी केली जाते शिवरायांची जयंती? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद?

Feb 17, 2026 | 04:36 PM
स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

Feb 17, 2026 | 04:32 PM
भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

भाविश अग्रवालांच्या अडचणी वाढल्या? OLA CEO विरुद्ध निघाले अटक वॅारंट, विषय काय?

Feb 17, 2026 | 04:26 PM
AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

AI मुळे बदलणार प्रवासाचा अनुभव! आता आवाजावर चालणार कार; अपघात आणि चोरी रोखण्यासाठी येणार हायटेक फीचर्स

Feb 17, 2026 | 04:23 PM
Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Feb 17, 2026 | 04:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.