• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Holi A Festival Of Sanctity By Removing Revenge Nrvb

होळी : सूडभावना दूर करून पवित्र राहण्याचा सण

होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ आणि पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो रसायन, हानीकारक रंगांचा नाही; तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 05, 2023 | 06:00 AM
holi a festival of sanctity by removing revenge nrvb
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

या उत्सवाची प्रथा का व कशी सुरू झाली याची माहिती आपण करून घेतली की ही गोष्ट आपल्या लक्षात येते. गणपती किंवा नवरात्रोत्सवासारखा हा उत्सव पूजा करून घरात साजरा करायचा नसतो. तर तो घराबाहेर साजरा करायचा असतो. कोरोनामुळे उत्सवासाठी घराबाहेर पडणे हे तर फार धोकादायक झाले आहे. होलिकोत्सव सण हा मनातील विकृत भावना दूर करून मन पवित्र व आनंदी करण्यासाठी असतो. तर थंडीमध्ये काही वृक्षांची पानगळ होते ती एकत्र करून जाळून परिसर स्वच्छ ठेवून उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी साजरा करायचा असतो.

उत्तर भारतात या सणाला ‘होरी-दोलायात्रा’ म्हणतात. दक्षिण भारतात या सणाला ‘कामदहन’ असे म्हणतात. महाराष्ट्रात ‘होळी किंवा शिमगा’ या नावाने हा सण ओळखला जातो. कोकण- गोमंतकात या सणाला ‘शिग्मा किंवा शिग्मो’ असे म्हणतात. श्री. रा. चिं. ढेरे यांनी हा शब्द कसा तयार झाला याविषयी व्युत्पत्ती सांगितली आहे. देशीनाममालेत हेमचंद्राने या उत्सवाला ‘सुगिम्हअ’ म्हणजे ‘सुग्रीष्मक’ असे नाव दिले आहे. या नावापासून कोकण-गोमंतकात ‘शिग्मा’ हा शब्द रूढ झाला. त्यानंतर त्याचे ‘शिमगा’ असे रूप रूढ झाले आहे.

होलिकोत्सवाविषयी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. कृष्ण लहान असताना, त्याला ठार मारण्यासाठी कंसाने पूतना राक्षसीला पाठविले. पण दूध पीत असताना, तिचा प्राण शोषून कृष्णाने त्या दुष्ट पूतना राक्षसीला यमसदनाला पाठवले. त्याचे प्रतिक म्हणून होळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी पूतना राक्षसीला जाळण्यात येते. महाराष्ट्रात याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते. पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावच्या मुलांना ढुंढा राक्षसी त्रास देत नाही असा समज आहे.

आता यामागचे विज्ञान काय आहे ते पाहुया. होळीचा सण हा शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या दिवसात येतो. या दिवसात अनेक वृक्षांची पानगळ चालू असते. घराच्या परिसरात पानगळ झाल्याने रोगराई पसरण्याची शक्यता असते. अस्वच्छता हीच खरी ढुंढा राक्षसी ! अस्वच्छतेमुळे लहान मुले पटकन आजारी पडतात. पानगळीत पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो जाळण्याची प्रथा पडली.

स्वच्छता झाली की रोगराईची ढुंढा राक्षसीण मुलांना त्रास देत नाही. त्याकाळी पालापाचोळ्यापासून खत निर्माण होते ही कल्पना नव्हती. तरी कोकणात फार प्राचीन कालापासून हा पालापाचोळा शेतातील भाजावळीसाठी वापरण्याचीही प्रथा होती. पूर्वी धार्मिक गोष्टी लोक मनापासून पाळीत असत. म्हणून होलिकादहनाची प्रथा पडली आहे. आपला देश गरीब आहे, लोकसंख्या जास्त आहे. म्हणून आपल्या देशात स्वच्छतेची सवय नाही असे काही जण म्हणतात. पण ते ही कारण खरे नाही. कारण यासाठी केवळ पैशांची जरूरी नाही. तर जरूरी आहे ती इच्छाशक्तीची आणि सवयीची !

सरकारी, सार्वजनिक किंवा मंदिराची जागा ही प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. ती स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपलीही आहे ही भावना असणे जरूरीचे आहे. होळी हा सण स्वच्छतेसाठी आहे. घर, परिसर आणि मन स्वच्छ ठेवण्यासाठी आहे. मनातील विकृती, घाण दूर करून मन स्वच्छ आणि पवित्र ठेवण्यासाठी हा सण असतो. हा सण रंगांचा आहे पण तो रसायन, हानीकारक रंगांचा नाही; तर नैसर्गिक रंगांचा आहे. मन आनंदी रहावं. दु:ख, द्वेष, मत्सर आणि सूडभावना दूर करून मन पवित्र रहावं यासाठी हा सण येत असतो.

वसंतऋतूच्या आगमनाप्रीत्यर्थ होळीचा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूमध्ये विविध प्रकारची फुले विविध रंगांची उधळण करीत असतात. तर काही वृक्ष नवीन पालवीने नटलेले असतात. कोकिळचा आवाज निसर्गाचे माधुर्य अधिकच गोड करीत असतो. म्हणूनच वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे म्हटले जाते. १८ फेब्रुवारी रोजी सूर्याने सायन मीन राशीतप्रवेश केला. त्या दिवसापासूनच वसंत ऋतू सुरू झाला. ‘होळी जळाली, थंडी पळाली’ असे म्हटले जाते. परंतु यावर्षी थंडी केव्हाच पळाली. यावर्षी तशी थंडी कमीच होती. हवामानात होणारा हा असा बदल चांगला नाही. पिकांसाठी आणि माणसाच्या आरोग्यासाठी घातक आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होत आहे.

निसर्गात होणाऱ्या या बदलाला अर्थात आपणच कारणीभूत आहोत. आपण जर निसर्गाला जपले नाही तर निसर्ग आपणास जपणार नाही. म्हणूनच पर्यावरणाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे होळीचा सण साजरा करीत असतांना वृक्षतोड होणार नाही याकडे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आपले सण-उत्सव पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी असतात. भक्षण करण्यासाठी नसतात.

दा. कृ. सोमण

dakrusoman@gmail.com

Web Title: Holi a festival of sanctity by removing revenge nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2023 | 06:00 AM

Topics:  

  • holi
  • Revenge

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Samsaptak Drishti Yog: सूर्य आणि गुरु यांच्या योगामुळे तयार होणार प्रतियुती दृष्टी योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Samsaptak Drishti Yog: सूर्य आणि गुरु यांच्या योगामुळे तयार होणार प्रतियुती दृष्टी योग, या राशीच्या लोकांचे चमकेल नशीब

Jan 09, 2026 | 07:05 AM
Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Skoda Kylaq साठी 2 लाखाचं Down Payment केल्यास किती द्यावा लागेल EMI? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Jan 09, 2026 | 06:15 AM
भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, झपाट्याने व्हाल बारीक

भरपूर चालून पोट- मांड्यावरील इंचभर सुद्धा चरबी कमी होत नाही? मग वॉकनंतर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, झपाट्याने व्हाल बारीक

Jan 09, 2026 | 05:30 AM
खराब लाइफस्टाइलमुळे होतो Breast Cancer! वाचण्याचे उपाय जाणून घ्या

खराब लाइफस्टाइलमुळे होतो Breast Cancer! वाचण्याचे उपाय जाणून घ्या

Jan 09, 2026 | 04:15 AM
Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Pune Tourism: हिवाळ्यात बहरते पुण्याचे पर्यटनविश्व; हिरव्या झालेल्या डोंगररांगा अन्…

Jan 09, 2026 | 02:35 AM
PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

PUNE NEWS: आरटीओकडून पीएमपीला नोटीस देण्याची तयारी; मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गंभीर दखल

Jan 09, 2026 | 02:00 AM
महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

Jan 09, 2026 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.