• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Blogs »
  • Why Indians Leave The Citizenship Of India

विशेष : का सोडलं जातंय भारतीयत्व?

लहानपणापासून देशाबद्दल अभिमान असणारी प्रतिज्ञा दररोज करणारे लोक नंतर त्याच देशाचं नागरिकत्व का सोडतात, हा मोठा चिंतेचा विषय आहे. भारतातून परदेशात कामानिमित्त गेलेले नागरिक नंतर त्या देशात स्थायिक होतात आणि तिथलेच होतात, हे भारतीय नागरिकत्व सोडण्याचं कारण असल्याचं सांगितलं जात असलं, तरी तेवढंच कारण त्यासाठी पुरेसं नाही.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 31, 2022 | 06:00 AM
विशेष : का सोडलं जातंय भारतीयत्व?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये एक लाख ६३ हजार ३७० लोकांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आहे. संसदेत सादर केलेल्या दस्तावेजात असं म्हटलं आहे की, या लोकांनी ‘वैयक्तिक कारणांसाठी’ नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी सर्वाधिक ७८ हजार २८४ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडलं. यानंतर २३ हजार ५३३ लोकांनी ऑस्ट्रेलियन नागरिकत्व घेतलं आणि २१ हजार ५९७ लोकांनी कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारलं. चीनमध्ये राहणाऱ्या ३०० लोकांनी तेथील नागरिकत्व घेतलं आणि ४१ जणांनी पाकिस्तानचं.

२०२० मध्ये नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या ७५ हजार २५६ होती आणि २०१९ मध्ये एक लाख ४४ हजार १७ लोकांनी नागरिकत्व सोडलं. २०१५ ते २०२० या कालावधीत आठ लाखांहून अधिक लोकांनी नागरिकत्व सोडलं. २०२० मध्ये, या आकडेवारीत घट झाली होती; परंतु यामागील कारण कोरोना होता.

कोरोनाचं सावट दूर झाल्यानंतर आता परदेशी नागरिकत्व स्वीकारण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोनामुळं काम बंद पडल्यामुळं गेल्या वर्षीचे काही लोक नागरिकत्व घेऊ शकले नाहीत. त्यांनाही या वर्षी नागरिकत्व मिळालं आहे. भारतीय नागरिकत्व का सोडत आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. जर भारताला आपलं नागरिकत्व सोडण्याचं किंवा ब्रेन ड्रेनचं प्रमाण नियंत्रित करायचं असेल तर त्याला अनेक पावलं उचलावी लागतील.

नवीन संधींपासून दुहेरी नागरिकत्वापर्यंत चांगल्या सुविधांचा विचार करणं आवश्यक आहे. अमेरिकेसारख्या देशात जीवन जगणं खूप सोपं आहे. राहणीमान खूप चांगलं आहे. त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतात. त्यांना भारतापेक्षाही चांगल्या संधी मिळतात. जितकं चांगलं काम करता, त्यानुसार चांगले पैसे मिळतात.

परदेशात कामाचे तास निश्चित केले जातात. कामाच्या ठिकाणी नियम आणि कायदे पाळले जातात. भारतात नियमांचं फारसं पालन केलं जात नाही. त्यामुळं एकदा परदेशात गेलं, की तिथलं नागरिकत्व स्वीकारण्याची आणि परत न येण्याची मानसिकता तयार होते. दुसऱ्या देशात राहून काम करायचं असेल तर तिथलं नागरिकत्व घ्यायला काय हरकत आहे, असा बऱ्याच परदेशस्थ भारतीयांचा सवाल आहे.

बहुतेक लोक चांगलं काम, पैसे आणि चांगलं आयुष्य या शोधात देश सोडून जातात. मोठ्या देशांत चांगल्या सुविधा मिळतात; पण बरेच लोक छोट्या देशांमध्येही जातात. अनेक छोटे देश व्यवसायासाठी चांगल्या सुविधा देतात.

हरेंद्र मिश्रा हे ज्येष्ठ पत्रकार असून गेल्या २२ वर्षांपासून ते इस्रायलमध्ये राहत आहेत. ते म्हणतात, की त्यांचे भारताशी भावनिक नाते जोडले असले, तरी ते इथले नागरिकत्व सोडू शकत नाही. त्यांची पत्नी इस्रायलची असून त्यांची मुलं तिथंच जन्मली असून त्यांचं तिथलं नागरिकत्व आहे; पण भारतीय पासपोर्टमुळे त्यांना खूप अडचणी येत असल्याचं त्याचं म्हणणं आहे.

बहुतेक देशांमध्ये जाण्यासाठी त्यांना व्हिसा घ्यावा लागतो; पण इस्त्रायलचा पासपोर्ट असेल तर अनेक देशांत व्हिसाशिवाय जाता येतं. परदेशी नागरिकत्व स्वीकारण्यामागं पासपोर्ट हे ही एक महत्त्वाचं कारण आहे. भारतीय पासपोर्टवर सध्या व्हिसाशिवाय ६० देशांमध्ये जाऊ शकता.

इतर अनेक देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. पासपोर्ट क्रमवारीत १९९ च्या यादीत भारत सध्या ८७ व्या क्रमांकावर आहे. भारतानं दुहेरी नागरिकत्वाची तरतूद आणली तर नागरिकत्व सोडणाऱ्यांमध्ये घट होईल. ज्या ठिकाणी जन्मलो, त्या ठिकाणचं नागरिकत्व नेहमीच असले पाहिजे, असं बऱ्याच परदेशस्थ भारतीयांचं मत आहे; पण भारत दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देत नाही, त्यामुळं नागरिकत्व सोडण्याशिवाय पर्याय नाही, असं पर्याय नसल्याचं नागरिकांचं मतं आहे.

दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नसल्यानं इतर कोणत्याही देशाचं नागरिकत्व हवं असेल तर भारताचं नागरिकत्व सोडावं लागतं. ‘ओसीआय’ कार्ड हे परदेशात स्थायिक झालेल्या आणि तिथलं नागरिकत्व घेतलेल्या भारतीय लोकांसाठी असलेल्या एका विशेष सुविधेचं नाव आहे. ‘ओसीआय’चा अर्थ आहे – ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया.

वास्तविक, जगातील अनेक देशांमध्ये दुहेरी नागरिकत्वाची सुविधा आहेच; परंतु भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं, तर त्याला त्याचे भारतीय नागरिकत्व सोडावं लागतं. अशा लोकांची संख्या लाखोंच्या घरात आहे, ज्यांनी अमेरिका, ब्रिटन किंवा कॅनडासारख्या देशांचं नागरिकत्व घेतलं असलं, तरी त्यांचे भारताशी संबंध कायम आहेत.

भारताचं नागरिकत्व सोडल्यानंतर या लोकांना भारतात येण्यासाठी व्हिसा घ्यावा लागला. अशा लोकांच्या सोयीची काळजी घेत २००३ मध्ये भारत सरकारनं ‘पीआयओ कार्ड’साठी तरतूद केली. ‘पीआयओ’ म्हणजे- भारतीय वंशाची व्यक्ती. पासपोर्टप्रमाणे हे कार्ड दहा वर्षांसाठी दिलं जात होतं. यानंतर, प्रवासी भारतीय दिवसानिमित्त, भारत सरकारनं २००६ मध्ये हैदराबादमध्ये ‘ओसीआय’ कार्ड देण्याची घोषणा केली.

बऱ्याच काळापासून ‘पीआयओ’ आणि ‘ओसीआय’ कार्ड दोन्ही प्रचलित होते; परंतु २०१५ मध्ये ‘पीआयओ’ची तरतूद रद्द करून सरकारनं ‘ओसीआय’ कार्ड चालू ठेवण्याची घोषणा केली. ‘ओसीआय’ आयुष्यभर भारतात राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी देते. तसेच ‘ओसीआय’धारक व्यक्ती व्हिसाशिवाय भारतात येऊ शकते.

भारतीय गृह मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, ‘ओसीआय’ कार्डधारकांना भारतीय नागरिकांसारखे सर्व अधिकार आहेत; परंतु ते चार गोष्टी करू शकत नाहीत. निवडणूक लढवू शकत नाही आणि मतदान करू शकत नाही. सरकारी नोकरी किंवा घटनात्मक पद धारण करू शकत नाही, शेतजमीन विकत घेऊ शकत नाही.

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता येत्या काही वर्षांत भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. भारताची आर्थिक स्थिती इतर देशांच्या परिस्थितीपेक्षा चांगली आहे. आता येथे अधिक संधी येतील. त्यामुळं लोकांना भारतात राहायला आवडेल. नागरिकत्व कायदा, १९५५ चे कलम ८ आणि नागरिकत्व नियम, २००९ चे नियम २३, एखाद्या व्यक्तीने त्याचं नागरिकत्व कोणत्या पद्धतीनं सोडलं जाऊ शकतं हे नमूद केलं आहे. आजकाल, ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते.

गेल्या तीन वर्षांत भारतीयांनी नागरिकत्व सोडण्यासाठी अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटन या देशांना सर्वाधिक पसंती दिली आहे. भारतीयांनी परदेशात जाऊन आपले नागरिकत्व सोडण्याची अनेक कारणं होती. २०२१ मध्ये ‘इंटरनॅशनल’नं केलेल्या एक्सपॅट इनसाइडर सर्वेक्षणानुसार, ५९ टक्के भारतीयांनी चांगल्या रोजगाराच्या संधींसाठी परदेशात स्थायिक होण्यास प्राधान्य दिलं.

जीवनात चांगल्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतीयांना पसंती दिली आहे. भारतीय अमेरिकन हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रवासी गट आहे. तिथं हा समूह सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक शिक्षितांपैकी एक आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबाचं सरासरी उत्पन्न सुमारे एक लाख २३ हजार ७०० डॉलर आहे. भारतात ६३ हजार ९२२ डॉलर सरासरी उत्पन्न आहे. तिथं जवळपास दुप्पट आहे. अमेरिकेतील ७९ टक्के भारतीय समुदाय पदवीधर आहेत, तर भारताची राष्ट्रीय सरासरी ३४ टक्के आहे.

भारतीयांनी परदेशात स्थायिक होण्याचं आणि त्यांचं नागरिकत्व सोडण्याचं आणखी एक महत्त्वाचं आणि वेगानं उदयास येणारं कारण म्हणजे ‘गोल्डन’ व्हिसा. अनेक देश ही सुविधा देतात. सिंगापूर आणि पोर्तुगालसारखे देश हा कार्यक्रम चालवतात. या कार्यक्रमात श्रीमंतांना नागरिकत्व घेण्याऐवजी या देशांमध्ये मोठी रक्कम गुंतवावी लागते.

अलिकडच्या वर्षांत अशा कार्यक्रमांना प्राधान्य देणाऱ्या भारतीयांची संख्या वाढली आहे. लंडनस्थित सल्लागार कंपनी ‘हेन्ली अँड पार्टनर्स’च्या मते, २०२० मध्ये गुंतवणूक स्थलांतर योजनांसाठी भारतीयांकडून चौकशीच्या संख्येत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे श्रीमंत लोक विविध कारणांमुळे देश सोडून जातात.

भागा वरखडे

warkhade.bhaga@gmail.com

Web Title: Why indians leave the citizenship of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • American citizenship

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

Navi Mumbai : नेरुळमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Wardha : मतचोरीविरोधात १९ ऑगस्टला महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्चा

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

महागड्या गाड्यांबद्दल खूप ऐकलंत, आता सर्वात स्वस्त Luxury Supercars बद्दल जाणून घ्या

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

R Ashwin बनणार Team India चा प्रशिक्षक? आशिया कपच्या तयारीदरम्यान, ‘या’ भारतीय खेळाडूने केले सूचक विधान

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Raigad : खोपोलीत मतदार याद्यांमध्ये सारखी नावे, आपचा मोठा खुलासा

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Nashik : नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Sindhudurg : सिंधुदुर्गात वाहन चालक-मालक संघटना स्थापन, नोंदणी पूर्ण

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Raju Shetty : .. ठेका फक्त शेतकऱ्यांनी घेतलाय का?- राजू शेट्टी यांचे चंद्रकांत पाटलांना प्रतिउत्तर

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.